पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज एकूण ८ स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार. या आठवड्यात जो निकाल लागणार आहे त्या मार्कांची विभागणी ३०% SMS व ७०% परीक्षकांची मते अशी आहे. पहिल्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात जास्त मार्क परीक्षकांनी दिले. याने "आम्ही ठाकर ठाकर" सदर केले. मूळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना धो महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, स्वरदा आणि उर्मिला होत्या. कोरस मस्त होते. सलीलच्या comments मस्त होत्या.




दुसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "कृष्णा मजकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून" मूळ गायक आणि संगीत यज्ञेश्वर लिंबेकर, रचना माणिक प्रभू, अल्बम भक्तीचा मळा. गुण आणि मत दोन्ही प्रमाणे हि दुसर्या क्रमांकावर होती. गाणं ठीक झाले. पण नेहमीप्रमाणे परीक्षकांना खूप आवडले. सलील बेस्ट या मधील comments अगदी विनोदी.




तिसर्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर. "झिनी झिनी वाजे बीन". मुळ गायिका आशा भोसले. गीत बा. भ. बोरकर आणि संगीत श्रीधर फडकेचे. ऋतू हिरवा या अल्बम मधील हे गाणं आहे. गाण्यात खूप मजा आली नाही. प्रसन्न वाटले नाही. सलीलने खूप छान बा. भ. बोरकरांच्या ४ ओळी सांगितल्या.

स्वर्ग नको सूरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
मुक्ती नको मज तृप्ती नको मज येथील हर्ष नी शोक हवा

गाणं खूप गंभीर वाटले, असे सलीलला वाटले आणि अवधूतच्या मते गाणं सुराला जरा कमी झालं.


चौथ्या क्रमांकार होती अपूर्वा गज्जला. हिला मत कमी होती पण गुणांच्या जोरावर हे पुढे आली. "या पंढरीचे सुख पाहता डोळा तुझा तो जिव्हाळा योगीयांचा". मूळ गायिका आणि संगीत किशोरी अमोणकर, रचना संत एकनाथ, अल्बम रंगी रंगला श्रीरंग. गाणं खूपच सुंदर झाले. अपूर्वा खूप छान गाणं म्हणायला लागली आहे.



Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

पाचव्या नंबर होती स्वरदा गोखले. हिला सगळ्यात जास्त मत मिळाली आहेत. "मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा" मुळ गायिका कृष्ण कल्ले, गीत ना. घ. देशपांडे, संगीत यशवंत देव. अवधूतवर स्वरदाने फेकलेला गुगली जोरदार होता. गाणं मस्त झाले. सलीलने जरा excitement कमी करून गा असा सल्ला दिला.



आता Danger Xone सुरु झाला. अभिलाषा चेल्लम, ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे या तिघी होत्या. त्यात प्रथम आली अभिलाषा चेल्लम. हिला खूपच कमी गुण मिळाले होते, पण SMS भरपूर आले आहेत. "जंतर मंतर रातीला चंद्राची पिंडली चोरून नेली" हे बेला शेंडे ने म्हटलेले गाणं सादर केले. गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी ह्याचे तर हृदयातील गाणं या अल्बम मधील हे गाणं आहे. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला, मृण्मयी आणि अपूर्वा होत्या. गाणं मस्त झाले. हि गाणं छानच म्हणते. पण हिला Danger Zone चा खूप ताण आला आहे असे वाटत होते.




त्यानंतर आली ऋतुजा लाड "कुण्या गावाचे आलं पाखरू". चित्रपट "सुशीला" मधील हे गाणं, गायलंय "उषा मंगेशकर" ह्यांनी, गीत आहे, जगदीश खेबुडकरांचे तर संगीत आहे राम कदम यांचे. हिला शेवटून दुसर्या नंबर वर मार्क मिळाले होते. कोरसमध्ये मृण्मयी आणि अभिलाषा होत्या. गाणं चांगले झाले. अवधूतच्या comments जोरदार होत्या.



सगळ्यात शेवटी आली अश्विनी देशपांडे. "ऋतुराज आज वनी आला". मुग्धा वैशंपायनची नक्कीच आठवण झाली. अश्विनीचे गाणं परत नाकातून वाटले. मुळ गायिका मधुवंती दांडेकर, गीत विध्याधर गोखले, संगीत प्रभाकर भालेकर, नाटक मदनाची मंजिरी. हे गाणं मस्त म्हटले. हे हिचे ह्या स्पर्धेतील शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहित नसून देखील मस्त म्हटले. सलीलचे सैपाकघरातील कॉम्मेंत्स मस्त होत्या.




आता निकाल. आजच्या स्पर्धेत आज बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळाली.




मार्क या प्रमाणे
अश्विनी देशपांडे - परीक्षक ७३.५ % SMS - ९.०२%
ऋतुजा लाड - परीक्षक ८०.0 % SMS - ५.२४ %
अभिलाषा चेल्लाम - परीक्षक ७७.५% SMS - ११.८५%
स्वरदा गोखले - परीक्षक ८१% SMS - २१.७५ %
अपूर्वा गज्जला - परीक्षक ८८.५ % SMS - ५.५९%
मृण्मयी तिरोडकर - परीक्षक ८७.५ % SMS - १६.५२%
उर्मिला धनगर - परीक्षक ९५% SMS - १९.७६ %
राहुल सक्सेना - परीक्षक १०० % SMS - १०.२७ %


Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Ashwini Deshpande : Marks 73.5% SMS - 9.02%
Rutuja Laad : Marks 80.0% SMS - 5.24 %
Abhilasha Chellam : Marks 77.5% SMS - 11.85 %
Swarada gokhale : Marks 81.0% SMS - 21.75 %
Apurva Gajjala : Marks 88.5% SMS - 5.59 %
Mrunmayi Tirodkar : Marks 87.5% SMS - 16.52 %
Urmila Dhangar : Marks 95.0% SMS - 19.76 %
Rahul Saxena :Marks 100.0% SMS - 10.27 %

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २४ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

उर्मिला धनगरने म्हटले "मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे". मूळ गायक सोनू निगम, मनमोहन सिंग, गीत समीर यांचे, तर संगीत ए. आर. रहमान यांचे. हे गाणं The Legend of Bhagat Sing या चित्रपटातील आहे. गाणं अप्रतिम झाले. अगदी मनापासून म्हटले.





सलील कुलकर्णीने आज "दमलेल्या बापाची या कहाणी तुला" हे गाणं म्हटले.




मृण्मयी तिरोडकरने "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी". मुळ गायिका आशा भोसले. गीत ग. दि. माडगुळकर यांचे तर संगीत दत्ता डावजेकर यांचे. "पाहू रे किती वाट" या सिनेमातील हे गाणं आहे. गाणं चांगले झाले.





शेवटचे गाणं म्हणायला आली अभिलाषा चेल्लाम. "वंदे मातरम" , मूळ गायिका लता मंघेष्कर, गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय, संगीत हेमंत यांचे , चित्रपट आनंद मठ. कोरसमध्ये होत्या स्वरदा, मृण्मयी, ऋतुजा आणि अपूर्वा





कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मान्यवर पोलिसांना स्टेजवर बोलावून झाली.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २४ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ८ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील वर्षी झालेल्या हल्ल्याच्या स्मृती प्रीत्यर्थ हा कार्यक्रम पोलिसांना समर्पित केला होता. कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या "जयोस्तुते श्री महन्मंगले" या गाण्याने झाली. मूळ गाणं लता मंगेशकरने म्हटलेले आहे. गीत स्वातंत्रवीर सावरकरांचे आहे तर संगीत मधुकर गोळवलकरांचे आहे. कोरस मध्ये स्वरदा, मृण्मयी, अश्विनी आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. आज मार्क दिसणार नाहीत.

सलील म्हटलेल्या काही ओळी.

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मुठ पोलादी जयांची हि धरा दासी तयांची
पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
हे श्वास येथे घ्यावयाचा.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे. "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधिला पेटली न वात" मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज संगीत वसंत प्रभू. गाणं चांगले झाले. पण खूप मनाला भावले नाही. आर्या आम्बेकारची आठवण आली. सलील ने कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली.

महापुरुष मरतात तेव्हा जागे होतात जागोजागचे संगमरवरी दगड
आणि पुन्हा एकदा त्यांचे आत्मे चिणून मारतात त्यांना दुसऱ्यांदा बहुदा कायमचेच
म्हणून महापुरुष दोनदा मरतात एकदा वैर्यांकडून आणि एकदा भक्तांकडून
असे संगमरवरी मरण तुला न लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना



त्यानंतर आली स्वरदा गोखले "ए मेरे वतन के लोगो". मूळ गाणं लता मंगेशकरचे, गीत कवी प्रदीप, तर संगीत सी. रामचंद्र. ह्या गाण्यात सुरवातीला लाडिक भाव जास्त आले, दुखद येण्याऐवजी असे मला वाटले. पण नंतर चांगले झाले. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, ऋतुजा आणि अपूर्वा होत्या.




राहुल सक्सेनाचे "जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो" गाणं झाले. मूळ गाणं गायलंय सोनू निगम, रुपकुमार राठोड यांनी, गीत आहे इसरार अन्सारी यांचे, तर संगीत आहे जतीन ललित यांचे. हे गाणं सरफरोश या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा मृण्मयी व अमर ओक होते. गाणं खूपच सुंदर झाले. अगदी मनापासून होते.






अपूर्वा गज्जला हिने "सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव शिरी", मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. अमर ओकची बासरी उत्कृष्ट. हिचे गाणे खूपच छान झाले. आता पर्यंत हिने जी गाणी म्हटली त्यातील हेसगळ्यात उत्कृष्ट गाणं होत.




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धक घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आज दाखवणारे मार्क ८०% परीक्षक तर २० टक्के SMS आहे. सलीलने खूपच छान ४ ओळी सांगितल्या.
तसे नसते कोणीच आपले कसले मित्र कसली साथ
फक्त बारा सखे तुझे पाच काळे पंढरी सात.
कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. प्रथम क्रमांकावर होती ऋतुजा लाड. "चंद्रिका हि जणू" ह्या गाण्याचे सादरीकरण केले. मूळ गायक पं हृदयनाथ मंगेशकर. गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत गोविंदराव टेंबे. संगीत मानापमान या नाटकातील हे पद आहे. आजपासून SMS ला ३०% महत्व असणार आहे.




दुसऱ्या नंबर होती मृण्मयी तिरोडकर. "हि सांज सुखाने सजलेली, अन दरवळणारा श्वास तुझा". मूळ गायिका वैशाली सामंत. गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते, अल्बम "हि सांज सुखाने". गाणं छान झाले. अवधूत आणि सलीलच्या आपापसातील गप्पा मजेशीर होत्या.




तिसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. "झाल्या तिन्ही सांजा, करुनी शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा" हे गाणं सदर केले. मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत राम-लक्ष्मण. हे गाणं तुमचे आमचे जमलं या चित्रपटातील आहे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. "पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे" मूळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे यांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचे. खूपच सुंदर म्हटले. हिचे उच्चार खूपच छान आहेत. अवधूतच्या मते अंतरात लय नीट जमली नाही





पाचव्या नंबर वर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात कमी SMS आले असे म्हणणे होते. "राधा हि बावरी". याचे उच्चार नीट आले नाहीत. विशेषता रंग, शामरंग, वाट, हे नीट जमले नाहीत. मूळ गायक स्वप्नील बांदोडकर, संगीत आणि गीत अशोक पत्की, यांचे. हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे. हा नको तिथे हरकती घेतो.





सहाव्या क्रमांकावर होती अश्विनी देशपांडे. "पाखरा जा दूर देशी". मूळ गायिका सुमन कल्याणपूर, गीत अशोकजी परांजपे यांचे आणि संगीत अशोक पत्की यांचे. सलीलच्या मते गाणं दडपण ठेवून म्हटले. अवधूतच्या मते पण जरा पाखरांचा balance जरा हलत होता.



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

मग Danger zone मधील तिघींची गाणी झाली. संहिता प्रथम आली, "ये रे घना" SMS मध्ये चौथ्या क्रमांकावर होती असे म्हणणे होते. मूळ गायिका आशा भोसले, गीत आरती प्रभू यांचे आणि पं हृदयनाथ मंगेशकर यांचे. हिचे पं गाणं मध्ये मध्ये श्वासाला जरा चुकत होते. "टाकुनिया घरदार" जरा बेसूर झाले. गाणं जरा दडपणाखाली झाले असे वाटत होते. आज आपण जाणार या कार्यक्रमातून अस हिला वाटत होते कि काय असे वाटत होते.




त्यानंतर आली स्वरदा गोखले. "काय बाई सांगू कशी ग सांगू" मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शांत शेळके यांचे आणि संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे. हे गाणं पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातील आहे. गाणं ठीक झाले. खूप मस्त झाले अस वाटले नाही. गाणं लाडिक झाले तसेही हिचे गाणं तसच असते नेहमी.





अवधूतने काय बाई सांगू चे remix म्हटले.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "केळीचे सुकले बाग". मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत कवी अनिल यांचे आणि संगीत यशवंत देव यांचे. गाणं खूपच सुंदर झाले. वरचा सूर नीट लागला नाही असे अवधूतला वाटले. सलीलच्या मते अपुर्वाचा आवाज खूप सुंदर आहे.




आता निकाल, अपूर्वा, संहिता आणि स्वरदा Danger Zone मध्ये होत्या. सलील पण देवाची प्रार्थना करत होता. संहिताच्या अंगावर जेव्हा लाल दिवा पडला तेव्हा अपूर्वा तो दिवा आपल्या अंगावर पडतो कि काय असे बघत होती. इकडे मृण्मयी रडत होती. पण संहिता अगदी मजेत होती.

मार्क या प्रमाणे
संहिता चांदोरकर, परीक्षक ७१.६७%, SMS ११.६५
अपूर्वा गज्जला, परीक्षक ७५%, SMS ५.४७%
स्वरदा गोखले, परीक्षक ७२.३३%, SMS २०.११%
अश्विनी देशपांडे, परीक्षक ७७.३३%, SMS ५.१८%
राहुल सक्सेना, परीक्षक ७७.६७%, SMS ४.९०%
अभिलाषा चेल्लाम, परीक्षक ७८%, SMS ५.९५%
उर्मिला धनगर, परीक्षक ७८.६७ %, SMS २१.०६%
मृण्मयी तिरोडकर, परीक्षक ८१.६७%, SMS १९.०६%
ऋतुजा लाड, परीक्षक ९३.३३%, SMS ६.६१%

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धकांना घेऊन स्पर्धा सुरु झाली काल सुस्मिरता बाहेर पडली. आजचे मान्यवर परीक्षक शुभा मुदगल आज पल्लवीचा ड्रेस खूप छान होता आणि मुख्य म्हणजे ड्रेस वरची ओढणी ड्रेसला सूट होत होती. आता या आठवड्यात ८०% परीक्षकांचे मार्क आणि २०% SMS असे गणित असणार आहे. मान्यवर परीक्षकांचे मार्क दिसणार नाहीत, (याचा अर्थ ते मार्क नंतर manipulation साठी वापरता येतील )

आजचा कार्यक्रम समूह गीताने झाला. "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". शेजारी या सिनेमातील हे गाणं आहे.





अपूर्वाच्या गाण्याने स्पर्धेला सुरवात झाली "ना मानोगो तो दुंगी तुम्हे गारी रे". आज सगळे स्पर्धक गाण्यावर आधारित गाणी म्हणणार आहात. त्याप्रमाणे हे गाणं "मालकंस" या रागातील होते. गाणं जास्त भावपूर्ण हवे होते. श्वास पुरत नव्हता असे अवधूतचे मत होते. अवधूतने "ध" तर सलीलने "प" दिला.




दुसरे गाणं मृण्मयी तीरोडकरचे "घनु वाजे घुणघुण वारा वाहे रुणझुण". राग बागेश्री मधील हे गाणं आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत, आणि लता मंगेशकरच्या आवाजात हेमुळ गाणं आहे. गाण्याची सुरवात म्हणावी तितकी छान झाली नाही. सुरवातीचा आलाप अगदीच जमला नाही. दोन ध मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले "येणार नाथ आता". राग धानी वर आधारित असलेले हे गाणं सुवासिनी या चित्रपटात आशा भोसलेच्या आवाजात, संगीत सुधीर फडकेचे आणि गीत ग दि माडगुळकरांचे आहे. गाणं चांगले झाले. पण खालचे स्वर तितकेसे छान लागले नाहीत असे शुभा मुदगलचे मत होते. दोन प मिळाले.




नंतर आली रुतुजा लाड "घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद". राग सालगवराळी वर आधारित हे गाणं पं. जितेंद्र अभिषेकी यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात गायलेले आहे. याचे बोल पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे तर संगीत जितेंद्र अभिषेकीचेच आहे. गाणं खूपच मस्त झाले. हि सगळीच गाणी मस्त म्हणते. हिचा आवाज अगदी मधुर नाही पण खूप सुरेल आहे. दोन नी मिळाले.





त्यानंतर आली संहिता चांदोरकर "प्रभुजी गमला मनी तोषला." भैरवी मधील हे गाणं बालगंधर्वांनी गायलेले आहे. गीत विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे तर संगीत गंधर्व नाटक मंडळी यांचे. हे गाणं एकाच प्याला या नाटकातले आहे. जरा शांत होऊन गाणं म्हणायला हवे होते असे सलीलचे मत होते. घाईघाईत म्हटले असे शुभा मुदगलने म्हटले. अवधूतने ध व सलीलने "प" दिला.





Today all the participant will sing "raag" based songs. The program starts with the group song, "lakh lakh tejachi nyari duniya". First song in the competition is by Apurva Gajjalla "na manogo to dungi tumhi gaari re". Song is based on Malkans. Second song is by Mrunmayi Tirodkar "ghanu waje ghunghun vara vahe runzun". Based on raag "bageshri". This song is by Sant Dnyaneshwar, composed by Hrudayanath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar. Third song was by Swarada Gokhale "yenar naath ata". Based on raag dhani, sung by Asha Bhosale, composed by Sudhir Phadake and written by G. D. Madgulkar. This song is from movie "suwasini". Forth song was by Rutuja Laad, "ghei chaand makarand, priya ha milind", composed by Jitendra Abhisheki, written by Purushottam Darvhekar, sung by Jitendra Abhisheki. This song is from "katyar kalajat ghusali". Then comes Sanhita Chandorkar "Prabhuji gamala mani toshala". Original singer Balgandharva, written by Viththal Sitaram Gurjar, and composed by Gandharva natak mandali. Song is from Ekach Pyala.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


उर्मिला धनगरचे "रे नंदलाला तू छेडू नको ". राग मिश्र किरवाणी मधील हे गाणं शोभा गुर्टू यांनी गायले आहे. गीत उमाकांत काणेकर तर संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे. अधीर याद तुझी या अल्बम मधील हे गाणंआहे. गाणं चांगले झाले पण आजचे गाणं इतके छान झाला नाही म्हणजे बेसूर वगैरे कुठेच झाले नाही पण मजा आली नाही. सूर लावताना आवाजात कंप होता असे मान्यवर परीक्षकांचे मत होते. अवधूतने आणि सलीलने ध इतके कमी मार्क कधीच उर्मिलाला मिळाले नव्हते.



उर्मिला नंतर आला राहुल सक्सेना "प्रथम तुज पाहता जीव वेडावला". मुंबईचा जावई या चित्रपटातील, राग कलावती वर आधारित, हे गाणं रामदास कामत यांनी गायले आहे. ग. दि. माडगुळकरांचे गीत असून संगीत सुधीर फडकेंचे आहे. स्पर्श या शब्दामध्ये हिंदीची झाक येत होती सगळ्या ताना एकदम स्वच्छ आल्या काही ठिकाणी बेसूर झाले असे सलीलचे मत होते शुभा मुदगलच्या मते जरा संयमाने गायला हवे कारण उगाच आलाप आणि ताना घेण्याची गरज नाही आहे दोन ध मिळाले.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे " विकल मन आज झुरत असहाय". राग सरस्वती वर आधारित हे गाणं बकुल पंडित यांनी गायले आहे. गीत शांता शेळके यांचे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे. हे गाणं "हे बंध रेशमांचे" या नाटकातील आहे हि शास्त्रीय गाणं जास्त चांगले म्हणते हे परत या गाण्यावरून सिद्ध झाले पण हिचा आवाज नाकातून येतो बरेचदा असे मला जाणवते . गाणं छान झाले असे अवधूत म्हणाला श्वासावर नियंत्रण हवे . हे गाणं राग सरस्वती मधील आहे असे शुभा मुदगल म्हणाली सलीलचे उदाहरण मस्त होते . दोन्ही ध मिळाले .





शेवटचे गाणं सदर करायला आली अभिलाषा चेल्लम ऋतू हिरवा ऋतू बरवा ". राग चारुकेशी वर आधारित हे गाणं आशा भोसले यांनी गायले आहे. संगीत श्रीधर फडके यांचे तर गीत शांता शेळके यांचे आहे. हे गाणं ऋतू हिरवा या अल्बम मधील आहे. गाणं मस्तच झाले हिच्या कुठल्याच उच्चारात हिंदी किंवा तमिळची झाक येत नाही कोरस मध्ये अपूर्वागज्जला ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे होत्या कोरस मस्त झाले गाणं सोडताना जरा नित आले नाही असे अवधूत म्हणत होता आवाज खूप छान आहे असा शुभा मुदगलचा शेरा होता सलीलचे उदाहरण मस्त होते परत दोन ध मिळाले.




आजचा best performer म्हणून ऋतुजा लाड होती.




कार्यक्रमाची सांगता शुभा मुदगलच्या गाण्याने झाली. "तेरे बाके नैनो ने जादू डाला सावरिया."






Urmila Dhangar sings "re nandalala tu chhedu nako". Song based on Mishra Kirwani. Original singer Shobha Gurtu, written by Umakant Kanekar and composed by Shrikant Thakare, is from "adheer yaad tuzi". After this Rahul Saxena performs "pratham tuj pahata". Song is from Mumbaicha Javai, sung by Ramdas Kamat, written by G.D.Madgulkar and composed by Sudheer Phadake. Ashwini Deshpande sung "vikal man aaj zurat asahay", based on raag Sarswati, written by Shanta Shelke, composed by Jitendra Abhisheki, is from "he bandh reshamanche". Last song was by Abhilasha Chellam, "rutu hirva rutu barva". Original singer is Asha Bhosale, composed by Shreedhar Phadake, written by Shanta Shelke and is from album "Rutu Hirva". Todays best performer was "Rutuja Laad". Program ended by Shubha Mudgal's song "Tere baake nainone jadu daala savariya".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज अंतिम फेरीचा पहिला निकाल आहे. आज १० स्पर्धक आहेत. आज Danger Zone सुरु झाला आहे. सगळ्यात जास्त मार्क ज्याला मिळाले ती स्पर्धक आज प्रथम गाणं म्हणणार आहे. सगळ्यात जास्त मार्क अभिलाषा चेल्लाम. "कुठं तुम्ही गेला व्हता सांगा कारभारी" कोरस मस्त झाले. तसेच अभिलाशाचे गाणं देखील मस्त झाले.




दुसऱ्या स्थानावर आहे उर्मिला धनगर. "नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला शाम". हे गाणं जरी उर्मिलाच्या आवाजाला शोभत नसले तरी तिने गाणं खूपच छान म्हटले.




तिसऱ्या क्रमांकावर आला राहुल सक्सेना. "नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो.". पल्लवी फक्त राहुल बरोबरच हिंदीत का बोलते हे एक कोडेच आहे. कारण अभिलाषा आणि अपूर्वा देखील अमराठी आहेत, पण त्यांच्याशी ती मराठीतच बोलते. या गाण्यात इतके छान भाव आले नाहीत. पण प्रयत्न चांगला होता. या गाण्यात राहुल अमराठी आहे असे जाणवत होते. कारण बरेच शब्द तो अगदी प्रयत्नपूर्वक उच्चारतो आहे असे वाटत होते.



सलीलने पण हे गाणं म्हटले.



चौथ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फूलावीत." लय जरा कमी पडत होती असे अवधूतला वाटले.






पाचव्या क्रमांकावर होती "स्वरदा गोखले". "लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू ". गाणं चांगले झाले. खालचे स्वर स्थिर नव्हते असे मला वाटले.




This week the results for the final round will be announced. Today the order of singers is decided as per the marks plus votes they received last week. As per that, the first participant was Abhilasha Chellam. She sings "Kutha tumhi gela vhata sanga karbhari". Second highest was Urmila Dhangar, performs "Bai mi vikat ghetala sham". Third song was by Rahul Saxena "Nasates ghari tu jevha". Forth in order was Mrunmayi Tirodkar "Malachya malyamandi patache pani jaata". Fifth in the position was Swarada Gokhale "Limblon utaru kashi, asashi dur laamb tu".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

सहाव्या क्रमांकावर होती ऋतुजा लाड "पैल तो गे काऊ कोकताहे". अवधूतच्या मते professionaly गायला हवे. गाणं मस्तच झाले.




सातव्या क्रमांकावर होती "अपूर्वा गज्जल्ला". "सावलीस का कळे उन्हामधील यातना. " गाणं खूपच चांगले म्हटले आणि भूमिकेत शिरून म्हटले.




Danger Zone मध्ये असलेल्या स्पर्धकांना प्रोहत्सान म्हणून मनाली कुलकर्णी काही वाक्य बोलली.




आता शेवटचे ३ स्पर्धक, सगळ्यात प्रथम आली अश्विनी देशपांडे. "मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना" कलाकाराने कसे असायला हवे हे सांगितले. अवधूतचे नेहमीप्रमाणेच भन्नाट comments होते. "जाता जाता गाईन मी, गाता गाता गाईन मी, गेल्यावरही या गगनातील या गीतांमधुनी राहीन मी."





नवव्या क्रमांकावर होती सुस्मिरता डवाळकर "सख्या चला बागामंदी रंग खेळू चला." कोरस मध्ये अश्विनी, ऋतुजा, उर्मिला आणि मृण्मयी होत्या. हिला सगळ्या जास्त SMS मिळाले. गाणं चांगले झाले. शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहिती नसून देखील, tention न येऊ देता गायला.




त्यानंतर आली संहिता चांदोरकर, "येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अश्या क्षणांना". गाणं चांगले झाले.




आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे सुस्मिरता बाहेर पडली.




Sixth song was by rutuja Laad "Pail to he kau kokatahe", Seventh was Apurva Gajjala "Savalis ka kale unhamadhil yatana". Now Danger zone starts. Out of these 3 one will go out. First comes Ashwini Deshpande "Mala mhanatat ho mhanatat punyachi maina". Then Susmirata Dawalkar sings "Sakhya chala bagamandi rang khelu chala". Last song in todays's competition is sung by Sanhita Chandorkar "Yeu kashi priya, save tuzya ashya kshananna". After all the songs results were announced and Susmirata Dawalkar went out of the competition.


Susmirata - Marks 72.83% - SMS 56.34
Sanhita - Marks 81.67% - SMS 4.74
Ashwini - Marks 80% - SMS 1.93
Apurva - Marks 83.33 - SMS 3.45
Rutuja - Marks 83.33 - SMS 4.06
Swarada - Marks 85.00 - SMS 2.94
Mrunmayi - Marks 85.00 - SMS 8.43
Rahul - Marks 87.17 - SMS 3.52
Urmila - Marks 90% - SMS 11.64
Abhilasha - Marks 95% - SMS 2.96

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १० नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज दूसरा दिवस आणि आज कोणीही बाहेर पडणार नाही. आजचे परीक्षक आहेत रवींद्र साठे. पहिले स्पर्धक होती मृण्मयी तिरोडकर "कहना हि क्या". कोरस मध्ये शेवटी काहीतरी तालाची गडबड झाली. मृण्मयीच्या स्वरात कंप जाणवला. आज रवींद्र साठेचे मार्क दिसणार नाहीत. अवधूत आणि सलील कडून "नी" मिळाला.




दुसरे गाणं म्हणायला आली स्वरदा गोखले, "जिया ले गयो जी मोर सावरिया". सुरवातीचे स्वर अगदीच बेसूर झाले. पण तिच्या लक्षात आले. गाणं बेसूर झाले बरेच. "बासुरीया " म्हणताना बेसूर जाणवत होतेच. "ध" मिळाला. पण ध च्या लायकीचे गाणं निश्चित झाले नाही.




तिसरे गाणं म्हणायला आली ऋतुजा लाड "हिरे मोती मै न चाहू". गाणं इतके छान झाले नाही. म्हणजे काय चुकलं ते सांगता येत नाही पण गाणं मनाला भावले नाही. गाणं छान झाले असे परीक्षक म्हणाले, मार्क "ध" आणि "नी" मिळाला.




चौथे गाणं म्हणायला आली संहिता चांदोरकर "जबान पे लगा लगा". गाणं चांगले झाले. सलीलच्या मते जरा हाताचे राखून गायलीस. त्यामुळे बहुतेक त्याने पण हाताचे राखून मार्क दिले. "नी" व "ध" मिळाला.





पाचव्या गाण्यापासून मराठी गाण्याची सुरवात झाली. सुस्मिरता डवालकर आली "कौसल्येचा राम बाई". हे गाणं एकदमच संथ आहे. त्यामुळे संहिताच्या गाण्यानंतर एकदम मिळमिळीत वाटले. "राम" नीट ऐकू आला नाही तो जरा स्पष्ट म्हणावा असा एक सल्ला होता. दोन्ही "ध" मिळाले.




मग आली अपूर्व गज्जला, "तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल". गाणं चांगले म्हटले. गाणं सुरवातीला जरा बेसूर झाले. पण नंतर गाणं चांगले झाले. दोन्ही "ध" मिळाले.





त्यानंतर राहुल सक्सेना आला "काळ देहासी आला खाऊ". गाणं चांगला झाले. पण अति जास्त नको तिथे ताना घेतल्या. आणि काही ठिकाणी थोडे बेसूर पण झाले. मराठीतील उच्चार आले नाहीत. दोन "ध" मिळाले.







Today is the second day of the first final week. Today no one will be out of competition. Only the best performer will be announced. Today's special judge is Ravindra Sathe. First song was by Mrunmayi Tirodkar "kahana hi kya jo nain ek anjan se mile". Second song was by Swarada Gokhale "jiya lo gayo ji mora savariya". Third song was by Rutuja Laad "hire moti mai na chahu". Forth song was by Sanhita Chandorkar "jaban pe laga laga". From fifth song Marathi songs started. This was done by Susmirata Davalkar "kauselyecha raam bai ". Sixth song was by Apurva Gajjala "tumhavar keli mi marji bahal" Seventh song was by Rahul Saxena "kaal dehasi aala khau".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


रवींद्र साठेचे "अजब सोहळा"





सलीलच्या आग्रहावरून "पीकं करपल पक्षी दूरदेशी गेलं" रवींद्र साठेच्या आवाजात. या गाण्यासाठी रवींद्र साठेंना राज्य पुरस्कार मिळाला होता. यात खूप छान आठवणी आहेत. सलील, अवधूत आणि रवींद्र साठे आठवणी सांगत आहेत.




अश्विनी देशपांडेचे "मजवरी तयांचे प्रेम खरे, जे पहिले जडले ते उरे." नाकातून आवाज आज जरा कमी आला. सगळ्या ताना खूपच स्वच्छ घेतल्या. प आणि ध मिळाले. गाणं प आणि ध च्या लायकीचे नव्हते तर दोन्ही ध च्या लायकीचे होते.





मग आली अभिलाषा चेल्लाम, "घनरानी साजणा". "सुखद मधुर वाटतात हवे, यौवना" यानंतरचा आलाप अगदीच चुकला. पण नाहीतर गाणं कुठे चूक काढावी असे नव्हते. गाणं म्हटलेले अभिलाशाचेच वाटते असे सलीलचे मत होते. आवाज खूप उत्तम आहे असे रवींद्र साठेचे मत होते. "ध" व "नी" milale




उर्मिला धनगरचे "पानापानात दिसतो कान्हा". हि बरोबर हिच्या आवाजाला शोभतील अशीच गाणी निवडते. आणि चांगली म्हणते. कारण हिच्या आवाज बराच जाड आहे, मधुर आहे असे म्हणता येणार नाही. गाणं मस्त झाले. दोन्ही "सा" मिळाले.





आजचा सर्वोत्कृष्ट स्पर्धक होता "उर्मिला धनगर".




कार्यक्रमाची सांगता रवींद्र साठेच्या गाण्याने झाली "वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद"






Ravindra Sathe sung 2 songs. They are "must watch". Seventh participant was Ashwini Deshpande "Majvari tayanche prem khare je pahile jadile te ure". Abhilasha chellam sung "Ghanrani sajana". Urmila dhangar sung "Panapanat disato kanha". This week's best performer was "Urmila Dhangar". Program ended by Ravindra Sathe's song "Valan vatatalya zadit hirave chand".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

मग आली ऋतुजा लाड "जाहल्या काही चुका". मस्तच झाले. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे म्हणणे आहे.



त्यानंतर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची". याचे पण उच्चार नीट आले नाहीत. कैफात तर कैफा असेच ऐकू आले. केसातल्या जुईचा ..इथे "जुईचा" शब्दावर जास्त थांबला. आणि पुन्हा शेवटची ओळ म्हणताना चूक झाली. एकूण बर्याच चुका झाल्या.



मग आला सिद्धेश परळीकर "दूर नदीच्या पल्याड केव्हा". सुरवातीला याचे खालचे नोटस नीट लागले नाहीत. गाणं चांगले झाले असे सगळे म्हणाले. या वेळेस गाण्याबद्दल जास्त बोलणे झाले. याच्या गाण्याच्या पद्धतीबद्दल फार नाही.




त्यानंतर समीक्षा भोबेचे "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला". चे बरेच उच्चार नाकातून येतात. जसे "फुलला" जेव्हा सोडताना अगदी नाकातून येते. सलीलने पुरणपोळीचे उदाहरण चांगले झाले.




अवधूतने तुझे देख के मेरी मधुबाला या गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या.




सगळ्यात शेवटचे गाणं झाले आकांक्षा देशमुखचे "आला ग बाई आला ग" सुरवातीचा आलाप अगदीच बेसूर झाला. काही जागा खरच बेसूर झाल्या. पण गाण्याचा आत्मा अगदी नीट धरून ठेवला होता. शब्द नीट बघावे असा सल्ला श्रुतीताई म्हणाल्या.





आता निकाल. आज २ स्पर्धक पुढे जाणार. आज स्वरदा गोखले आणि ऋतुजा लाड पुढे गेल्या. आता अंतिम फेरीत आहेत. राहुल सक्सेना, अभिलाषा चेल्लम, उर्मिला धनगर, मृण्मयी तिरोडकर, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे, ऋतुजा लाड, स्वरदा गोखले, संहिता चांदोरकर, सुस्मिरता डवालकर.




Then came Rutuja Laad "Jahlya kahi chuka". Prasanna prabhu tendulkar sung "jevha tichi na mazi chorun bhet zali". Siddesh paralikar sung "dur nadichya palyad kevha". Samiksha Bhobe performed "bai bai man moracha kasa pisara phulala". Last song was by Akanksha Deshmukh, "aala ga bai aala ga".

In the resultm 2 participant were selected, Rutuja Laad and Swarada Gokhale. Now there are 10 participant in the final. They are, Swarada Gokhale, Rahul Saxena, Abhilasha Chellam, Urmila Dhangar, Mrunmayi Tirodkar, Apurva Gajjala, Ashwini Deshpande, Rutuja Laad, Sanhita Chandorkar, Susmirata Dawalkar.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आजपासून Knock Out Round सुरु आहे आज एकूण १० स्पर्धक आहेत आणि त्यातील फक्त २ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आजच्या मान्यवर परीक्षक म्हणून आल्या आहेत श्रुती सलोडीकर. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत एकदम उद्या निकाल.

स्पर्धेची सुरवात आकांक्षा देशमुखच्या "हाची नेम आता न फिरे माघारी" या गाण्याने झाली. गाणं खूप छान झाले नाही. आवाज थरथरत होता. विशेषता स्वर सोडताना थरथर बरीच जाणवत होती.





दुसरे गाणं म्हणायला आला सौरभ काडगावकर , "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".माझ्या मते गाणं चांगलं झालं. पण कुठेतरी खूप आर्तता आली नाही याच्या म्हणण्यात असे जाणवले.





तिसरे गाणं म्हणायला आला सिद्धेश परळीकर, "फुल ते संपले गंध न राहिला". गंध न राहिला म्हणताना कधी कधी आवाज कंप पावला.





"तिन्ही सांजा सखे मिळाल्या" हे गाणं समीक्षा भोबे ने सदर केले. कधी कधी स्वराला पकडून नव्हते. थोडे बेसूर झाले असे वाटत होते. अवधूतच्या मते गाणं सुरु होत, किंवा सोडतो तेव्हा गाणं बेसूर होत. असेच इतर परीक्षकांचे मत होते.





मग आली ऋतुजा लाड. "सावरिया से नैन हो गये चार." गाणं छानच झाले. सगळे परीक्षक खुश. हे गाणं मी प्रथमच ऐकले. मस्तच म्हटले. सगळे सूर नीट लागत होते.






प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का". गाणं चांगले झाले. पण मधेच एक शब्द विसरला. स्वरावर पूर्णत्वाने या असा सल्ला श्रुती सलोडीकरने दिला.





This week it is going to be Knock Out round. Today there are 10 paticipant. Only 2 out of this lot will go to the finals. Todays special judge is Shruti Salodikar. Program starts by Akanksha Deshmukh's "hachi nem ata na phire maghari". Next song is by Saurabh Kadgaokar "Paradhin aahe Jagati Putra manavacha". Third song was by Siddesh Paralikar "phul te sampale gandh na rahila". Forth song was by Samiksha Bhobe, "Tinhi sanja sakhe milalya". Nex comes Rutuja Laad "Savariya se nain ho gaye char". Prasanna Prabhu Tendulkar sings "tya phulanchya gandhkoshi saang tu aahes ka"


Part 1

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.




मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.




त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.





मग कृष्णाने ढोलकी वाजवली.







स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.





कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.





Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.