Showing posts with label Shubha Mudgal. Show all posts
Showing posts with label Shubha Mudgal. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धकांना घेऊन स्पर्धा सुरु झाली काल सुस्मिरता बाहेर पडली. आजचे मान्यवर परीक्षक शुभा मुदगल आज पल्लवीचा ड्रेस खूप छान होता आणि मुख्य म्हणजे ड्रेस वरची ओढणी ड्रेसला सूट होत होती. आता या आठवड्यात ८०% परीक्षकांचे मार्क आणि २०% SMS असे गणित असणार आहे. मान्यवर परीक्षकांचे मार्क दिसणार नाहीत, (याचा अर्थ ते मार्क नंतर manipulation साठी वापरता येतील )

आजचा कार्यक्रम समूह गीताने झाला. "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". शेजारी या सिनेमातील हे गाणं आहे.





अपूर्वाच्या गाण्याने स्पर्धेला सुरवात झाली "ना मानोगो तो दुंगी तुम्हे गारी रे". आज सगळे स्पर्धक गाण्यावर आधारित गाणी म्हणणार आहात. त्याप्रमाणे हे गाणं "मालकंस" या रागातील होते. गाणं जास्त भावपूर्ण हवे होते. श्वास पुरत नव्हता असे अवधूतचे मत होते. अवधूतने "ध" तर सलीलने "प" दिला.




दुसरे गाणं मृण्मयी तीरोडकरचे "घनु वाजे घुणघुण वारा वाहे रुणझुण". राग बागेश्री मधील हे गाणं आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत, आणि लता मंगेशकरच्या आवाजात हेमुळ गाणं आहे. गाण्याची सुरवात म्हणावी तितकी छान झाली नाही. सुरवातीचा आलाप अगदीच जमला नाही. दोन ध मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले "येणार नाथ आता". राग धानी वर आधारित असलेले हे गाणं सुवासिनी या चित्रपटात आशा भोसलेच्या आवाजात, संगीत सुधीर फडकेचे आणि गीत ग दि माडगुळकरांचे आहे. गाणं चांगले झाले. पण खालचे स्वर तितकेसे छान लागले नाहीत असे शुभा मुदगलचे मत होते. दोन प मिळाले.




नंतर आली रुतुजा लाड "घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद". राग सालगवराळी वर आधारित हे गाणं पं. जितेंद्र अभिषेकी यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात गायलेले आहे. याचे बोल पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे तर संगीत जितेंद्र अभिषेकीचेच आहे. गाणं खूपच मस्त झाले. हि सगळीच गाणी मस्त म्हणते. हिचा आवाज अगदी मधुर नाही पण खूप सुरेल आहे. दोन नी मिळाले.





त्यानंतर आली संहिता चांदोरकर "प्रभुजी गमला मनी तोषला." भैरवी मधील हे गाणं बालगंधर्वांनी गायलेले आहे. गीत विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे तर संगीत गंधर्व नाटक मंडळी यांचे. हे गाणं एकाच प्याला या नाटकातले आहे. जरा शांत होऊन गाणं म्हणायला हवे होते असे सलीलचे मत होते. घाईघाईत म्हटले असे शुभा मुदगलने म्हटले. अवधूतने ध व सलीलने "प" दिला.





Today all the participant will sing "raag" based songs. The program starts with the group song, "lakh lakh tejachi nyari duniya". First song in the competition is by Apurva Gajjalla "na manogo to dungi tumhi gaari re". Song is based on Malkans. Second song is by Mrunmayi Tirodkar "ghanu waje ghunghun vara vahe runzun". Based on raag "bageshri". This song is by Sant Dnyaneshwar, composed by Hrudayanath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar. Third song was by Swarada Gokhale "yenar naath ata". Based on raag dhani, sung by Asha Bhosale, composed by Sudhir Phadake and written by G. D. Madgulkar. This song is from movie "suwasini". Forth song was by Rutuja Laad, "ghei chaand makarand, priya ha milind", composed by Jitendra Abhisheki, written by Purushottam Darvhekar, sung by Jitendra Abhisheki. This song is from "katyar kalajat ghusali". Then comes Sanhita Chandorkar "Prabhuji gamala mani toshala". Original singer Balgandharva, written by Viththal Sitaram Gurjar, and composed by Gandharva natak mandali. Song is from Ekach Pyala.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


उर्मिला धनगरचे "रे नंदलाला तू छेडू नको ". राग मिश्र किरवाणी मधील हे गाणं शोभा गुर्टू यांनी गायले आहे. गीत उमाकांत काणेकर तर संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे. अधीर याद तुझी या अल्बम मधील हे गाणंआहे. गाणं चांगले झाले पण आजचे गाणं इतके छान झाला नाही म्हणजे बेसूर वगैरे कुठेच झाले नाही पण मजा आली नाही. सूर लावताना आवाजात कंप होता असे मान्यवर परीक्षकांचे मत होते. अवधूतने आणि सलीलने ध इतके कमी मार्क कधीच उर्मिलाला मिळाले नव्हते.



उर्मिला नंतर आला राहुल सक्सेना "प्रथम तुज पाहता जीव वेडावला". मुंबईचा जावई या चित्रपटातील, राग कलावती वर आधारित, हे गाणं रामदास कामत यांनी गायले आहे. ग. दि. माडगुळकरांचे गीत असून संगीत सुधीर फडकेंचे आहे. स्पर्श या शब्दामध्ये हिंदीची झाक येत होती सगळ्या ताना एकदम स्वच्छ आल्या काही ठिकाणी बेसूर झाले असे सलीलचे मत होते शुभा मुदगलच्या मते जरा संयमाने गायला हवे कारण उगाच आलाप आणि ताना घेण्याची गरज नाही आहे दोन ध मिळाले.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे " विकल मन आज झुरत असहाय". राग सरस्वती वर आधारित हे गाणं बकुल पंडित यांनी गायले आहे. गीत शांता शेळके यांचे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे. हे गाणं "हे बंध रेशमांचे" या नाटकातील आहे हि शास्त्रीय गाणं जास्त चांगले म्हणते हे परत या गाण्यावरून सिद्ध झाले पण हिचा आवाज नाकातून येतो बरेचदा असे मला जाणवते . गाणं छान झाले असे अवधूत म्हणाला श्वासावर नियंत्रण हवे . हे गाणं राग सरस्वती मधील आहे असे शुभा मुदगल म्हणाली सलीलचे उदाहरण मस्त होते . दोन्ही ध मिळाले .





शेवटचे गाणं सदर करायला आली अभिलाषा चेल्लम ऋतू हिरवा ऋतू बरवा ". राग चारुकेशी वर आधारित हे गाणं आशा भोसले यांनी गायले आहे. संगीत श्रीधर फडके यांचे तर गीत शांता शेळके यांचे आहे. हे गाणं ऋतू हिरवा या अल्बम मधील आहे. गाणं मस्तच झाले हिच्या कुठल्याच उच्चारात हिंदी किंवा तमिळची झाक येत नाही कोरस मध्ये अपूर्वागज्जला ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे होत्या कोरस मस्त झाले गाणं सोडताना जरा नित आले नाही असे अवधूत म्हणत होता आवाज खूप छान आहे असा शुभा मुदगलचा शेरा होता सलीलचे उदाहरण मस्त होते परत दोन ध मिळाले.




आजचा best performer म्हणून ऋतुजा लाड होती.




कार्यक्रमाची सांगता शुभा मुदगलच्या गाण्याने झाली. "तेरे बाके नैनो ने जादू डाला सावरिया."






Urmila Dhangar sings "re nandalala tu chhedu nako". Song based on Mishra Kirwani. Original singer Shobha Gurtu, written by Umakant Kanekar and composed by Shrikant Thakare, is from "adheer yaad tuzi". After this Rahul Saxena performs "pratham tuj pahata". Song is from Mumbaicha Javai, sung by Ramdas Kamat, written by G.D.Madgulkar and composed by Sudheer Phadake. Ashwini Deshpande sung "vikal man aaj zurat asahay", based on raag Sarswati, written by Shanta Shelke, composed by Jitendra Abhisheki, is from "he bandh reshamanche". Last song was by Abhilasha Chellam, "rutu hirva rutu barva". Original singer is Asha Bhosale, composed by Shreedhar Phadake, written by Shanta Shelke and is from album "Rutu Hirva". Todays best performer was "Rutuja Laad". Program ended by Shubha Mudgal's song "Tere baake nainone jadu daala savariya".