Showing posts with label Shruti Salodikar. Show all posts
Showing posts with label Shruti Salodikar. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

मग आली ऋतुजा लाड "जाहल्या काही चुका". मस्तच झाले. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे म्हणणे आहे.



त्यानंतर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची". याचे पण उच्चार नीट आले नाहीत. कैफात तर कैफा असेच ऐकू आले. केसातल्या जुईचा ..इथे "जुईचा" शब्दावर जास्त थांबला. आणि पुन्हा शेवटची ओळ म्हणताना चूक झाली. एकूण बर्याच चुका झाल्या.



मग आला सिद्धेश परळीकर "दूर नदीच्या पल्याड केव्हा". सुरवातीला याचे खालचे नोटस नीट लागले नाहीत. गाणं चांगले झाले असे सगळे म्हणाले. या वेळेस गाण्याबद्दल जास्त बोलणे झाले. याच्या गाण्याच्या पद्धतीबद्दल फार नाही.




त्यानंतर समीक्षा भोबेचे "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला". चे बरेच उच्चार नाकातून येतात. जसे "फुलला" जेव्हा सोडताना अगदी नाकातून येते. सलीलने पुरणपोळीचे उदाहरण चांगले झाले.




अवधूतने तुझे देख के मेरी मधुबाला या गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या.




सगळ्यात शेवटचे गाणं झाले आकांक्षा देशमुखचे "आला ग बाई आला ग" सुरवातीचा आलाप अगदीच बेसूर झाला. काही जागा खरच बेसूर झाल्या. पण गाण्याचा आत्मा अगदी नीट धरून ठेवला होता. शब्द नीट बघावे असा सल्ला श्रुतीताई म्हणाल्या.





आता निकाल. आज २ स्पर्धक पुढे जाणार. आज स्वरदा गोखले आणि ऋतुजा लाड पुढे गेल्या. आता अंतिम फेरीत आहेत. राहुल सक्सेना, अभिलाषा चेल्लम, उर्मिला धनगर, मृण्मयी तिरोडकर, अपूर्वा गज्जला, अश्विनी देशपांडे, ऋतुजा लाड, स्वरदा गोखले, संहिता चांदोरकर, सुस्मिरता डवालकर.




Then came Rutuja Laad "Jahlya kahi chuka". Prasanna prabhu tendulkar sung "jevha tichi na mazi chorun bhet zali". Siddesh paralikar sung "dur nadichya palyad kevha". Samiksha Bhobe performed "bai bai man moracha kasa pisara phulala". Last song was by Akanksha Deshmukh, "aala ga bai aala ga".

In the resultm 2 participant were selected, Rutuja Laad and Swarada Gokhale. Now there are 10 participant in the final. They are, Swarada Gokhale, Rahul Saxena, Abhilasha Chellam, Urmila Dhangar, Mrunmayi Tirodkar, Apurva Gajjala, Ashwini Deshpande, Rutuja Laad, Sanhita Chandorkar, Susmirata Dawalkar.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आजपासून Knock Out Round सुरु आहे आज एकूण १० स्पर्धक आहेत आणि त्यातील फक्त २ स्पर्धक पुढे जाणार आहेत. आजच्या मान्यवर परीक्षक म्हणून आल्या आहेत श्रुती सलोडीकर. आज कोणाचेच मार्क दिसणार नाहीत एकदम उद्या निकाल.

स्पर्धेची सुरवात आकांक्षा देशमुखच्या "हाची नेम आता न फिरे माघारी" या गाण्याने झाली. गाणं खूप छान झाले नाही. आवाज थरथरत होता. विशेषता स्वर सोडताना थरथर बरीच जाणवत होती.





दुसरे गाणं म्हणायला आला सौरभ काडगावकर , "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".माझ्या मते गाणं चांगलं झालं. पण कुठेतरी खूप आर्तता आली नाही याच्या म्हणण्यात असे जाणवले.





तिसरे गाणं म्हणायला आला सिद्धेश परळीकर, "फुल ते संपले गंध न राहिला". गंध न राहिला म्हणताना कधी कधी आवाज कंप पावला.





"तिन्ही सांजा सखे मिळाल्या" हे गाणं समीक्षा भोबे ने सदर केले. कधी कधी स्वराला पकडून नव्हते. थोडे बेसूर झाले असे वाटत होते. अवधूतच्या मते गाणं सुरु होत, किंवा सोडतो तेव्हा गाणं बेसूर होत. असेच इतर परीक्षकांचे मत होते.





मग आली ऋतुजा लाड. "सावरिया से नैन हो गये चार." गाणं छानच झाले. सगळे परीक्षक खुश. हे गाणं मी प्रथमच ऐकले. मस्तच म्हटले. सगळे सूर नीट लागत होते.






प्रसन्ना प्रभू तेंडूलकर "त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का". गाणं चांगले झाले. पण मधेच एक शब्द विसरला. स्वरावर पूर्णत्वाने या असा सल्ला श्रुती सलोडीकरने दिला.





This week it is going to be Knock Out round. Today there are 10 paticipant. Only 2 out of this lot will go to the finals. Todays special judge is Shruti Salodikar. Program starts by Akanksha Deshmukh's "hachi nem ata na phire maghari". Next song is by Saurabh Kadgaokar "Paradhin aahe Jagati Putra manavacha". Third song was by Siddesh Paralikar "phul te sampale gandh na rahila". Forth song was by Samiksha Bhobe, "Tinhi sanja sakhe milalya". Nex comes Rutuja Laad "Savariya se nain ho gaye char". Prasanna Prabhu Tendulkar sings "tya phulanchya gandhkoshi saang tu aahes ka"


Part 1

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.




मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.




त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.





मग कृष्णाने ढोलकी वाजवली.







स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.





कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.





Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.