Showing posts with label Sagar Jadhav. Show all posts
Showing posts with label Sagar Jadhav. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

"पंचतुंड नररुंद मालधर" हे गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. गाणं सगळ्या स्पर्धकांनी मिळून म्हटले. ३ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन असतो. आज अंतिम फेरीत दाखल झालेले सगळे स्पर्धक होते आणि आजच्या स्पर्धेतून दोघे पुढे अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये जातील.






आजचे मान्यवर परीक्षक श्रुती सलोडीकर. सगळ्यात प्रथम आला तुषार शिंदे "विठ्ठल आवडी प्रेम भावो". गाणं झोकून देऊन म्हटले असे श्रुतीताईचे म्हणणे होते. आणि गाणी आपल्या आवाजाला नीट जमतील अशी निवडा. असा एक सल्ला दिला.




दुसरे गाणं म्हणायला सागर जाधव, "एक धागा सुखाचा". मस्तच म्हटले. याच्या गाण्यात भाव नेहमीत खूप छान येतात. शब्दोच्चार नीट असायला हवे असा एक सल्ला देण्यात आला. पण भाव सगळे खूप छान आले असा सगळ्यांचा सूर होता. गाण्यावर गळा चढवतो, त्याऐवजी गळ्यावर गाणं चढवायला हवे, असा एक सल्ला सलीलने दिला.




त्यानंतर आली स्वरदा गोखले, "एकला नयनाला विषय तो जाहला." श्रुतीताईच्या मते "जाहला" नसून "झाला" आहे. बाकी गाणं छान झाले असे मत होते.





मग आली श्रुती विश्वकर्मा "पथ जात धर्म किंवा नाते हि ज्यांना ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे". गाणं खूपच छान झाले. स्वराकडे थोडे लक्ष दे असा सल्ला होता. "हे बंध रेशमाचे" हे नाटक फाळणीनंतरचे आहे, हि एक गोष्ट कळली.




त्यानंतर आला सौरभ काडगावकर आला "परब्रह्म निष्काम देवा ". उच्चार नीट आले नाहीत असा एक सूर होता. परब्रह्म हा शब्द नीट आला नाही असे श्रुतीताईचे म्हणणे होते.




Today is the second day of the Knock out round. Program started by a "Nandi", "panchatund narrund maaldhar". Todays special judge is Shruti Salodikar.

First song in the competition was sung by Tushar Shinde, "Viththal avadi prembhav". Second was by Sagar Jadhav, "Ek dhaga sukhacha". Then came, Swarada gokhale, "ekach nayala vishay to zala". Forth song was by Shruti Vishkarma, "path, jaat, dharma, nate hi jyanna thave". Then Saurabh Kadgaokar sung "Parbhrahma nishkam to ha"


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

त्यानंतर आला तुषार शिंदे. "मनाच्या धुंदीत लहरीत ये न, सखे ग साजणी ये ना". हे गाणं मस्तच आहे. आणि चालीत एकदम फरक पडतो. गाणं मनातून यायला हवे असे सलोडीकरने सांगितले. आणि त्यानंतर बेगम अख्तर बरोबरच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ऐकण्यासारखा आहे.




मग स्वरदा गोखलेचे "अहो राया मला पावसात नेऊ नका." गाणं चांगल झाला. पण खूप मस्त झालं असे वाटले नाही.




त्यानंतर आली श्रुती विश्कर्मा "मी तर जाते जत्रेला, कुणीतरी बोलवा दाजीबाला" सुरवातीला श्रुती घाबरली होती असा वाटत होते, पण नंतर गाणं खूप छान झाले. परीक्षकांचे पण तसेच मत होते.





मग कृष्णाने ढोलकी वाजवली.







स्पर्धेच्या शेवटी सागर जाधव चे "मी आहे कोली, मुंबईच्या किनारी". मस्तच गायला. हा सगळी गाणी छानच म्हणतो. अवधूतच्या मते शास्त्रीय संगीताचा अभ्यास कमी आहे, पण जर गाणं छान म्हणत असेल तर त्याने काय फरक पडतो, हे मला अजून समजले नाहीये.





कार्यक्रमाचा शेवट श्रुती सलोडीकर यांच्या गाण्याने झाला.





Tushar Shinde sings "Manachya dhundit laharit ye na". Swarada Gokhale performs "Aho raya mala pavasat neu naka". Shruti Vishwakarma sings "Mi tar jate jatrela kunitari bolava dajibala". Sagar Jadhav sings "Mi aahe koli, mumbaichya kinari". Program ends by Shruti Salodikar's song.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २७ ऑक्टोबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

हिंदी गाण्याची सुरवात होण्याची आधी रोहित राउतला बोलावण्यात आले. "ये कौन रापचिक माल है, ये गो ये मैना पिंजडा बनाया सोने का", हे गाणं म्हटले.





सुस्मिरता डवालकर हिने हिंदी गाण्याची सुरवात केली. "बैरी पिया बडा रे बेदर्दी". गाणं मस्तच गायली. सगळ्या परीक्षकांना पण आवडले. सुरात होते एकदम आणि भाव पण होते. "नी" मिळाला.





यानंतर आला सागर जाधव. "तडप तडप इस दिल से, लुट गये हम तेरी मोहबत में ". सुरवातीला याचे उच्चार नीट आले नाहीत. अवधूतचे मत पण तसेच होते. आवाजाचा कंट्रोल नीट यायला हवा असे रोणू मुजुमदारचे मत होते. "प" मिळाला.





मग आली श्रुती विश्वकर्मा. "रोज शाम आती थी मगर ऐसी न थी," गाणं वेगळेच आहे. आणि हिला जमले पण नाही. वरचे स्वर खूपच कमी लागले. परीक्षांकांचे पण तसेच मत होते "प" मिळाला"





मग आली मृण्मयी तिरोडकर "चुपके से लग जा गले रात के चादर तले". हिच्या आवाजात एक थरथर जाणवत होते. आणि शेवटचे सूर नीट लागले नाहीत असेहि पण मत होते. "नी" मिळाला.






शेवटचे गाणं सदर करायला आली उर्मिला धनगर "चार दिनोका प्यार है रब्बा बडी लम्बी जुदाई". हि स्वतःच्या आवाजाला सुट होतील अशीच गाणी निवडते त्यामुळे गाणं मस्तच होते. सगळ्या लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या. अवधूत गुप्ते नामक क्षुद्र श्रोत्याची क्रूर हत्या झाली असे अवधूत म्हणाला. वरचा "सा" मिळाला.





आर्या, प्रथमेश आणि रोहितच्या आवाजात शेवटचे गाणं झाल. "आनंद पोटात माझ्या माईना"





आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे, संहिता चांदोरकर, मृण्मयी तिरोडकर, सुस्मिरता डवालकर आणि उर्मिला धनगर पुढे गेले. उरलेले पाच जण कालच्या ५ स्पर्धकांबरोबर पुढील आठवड्यात Knock Out Round ला येतील.





Now Hindi song round started. Befor participants singing hindi songs, Rohit Raut was called on stage. He sug "ye kaun rapchik maal hai". Then Susmita Davalkar performed "Bairi Piya bada re bedardi". Then Sagar Jadhav came on stage to sing "lut gaye hum teri mohabat me". After Sagar, Shruti Vishwakarma performed "Roj sham aati thi magar eisi na thi". Later Mrunmayi Tirodkar sung "chupke se lag ja gale rat ke chadar tale" Last song in the competition was by Urmila Dhangar "Lambi Judai". Before the result, Prathamesh, Arya and Rohit sung "Anand potat mazya maina". And as per both the days performances, Sanhita Chandorkar, Susmirata Davalkar, Mrunmayi Tirodkar and Urmila Dhangar went in the final round. Rest of the participant will meet in the Knock Out Round, next week.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २६ ऑक्टोबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज उपांत्य फेरीचा दुसरा भाग. आज कार्यक्रमाची सुरवात कार्तिकीच्या गाण्याने झाली. "कृष्णे वेधिली विरहणी बोले" हे गाणं म्हटले. आज मुग्धा आणि कार्तिकी कार्यक्रमाला आल्या होत्या.




आज उरलेले ९ स्पर्धक आहेत. आज पुन्हा हिंदी वर मराठी गाण्याचा समावेश असणार आहे. आजचे मान्यवर परीक्षक आहेत बासरीवादक रोणू मुजुमदार. आज अवधूतचे मार्क दिसणार आहेत.

स्पर्धेची सुरवात सुस्मिरता डवालकर च्या गाण्याने झाली. हिने "भेटी लागी जीवा लागलीसे आस" म्हटले. मधून जरा सुराला सोडून होते. गाणं चांगले झाले असे सलील म्हणाला. रोणू मुजुमदारने काय सांगितले ते नीटसे कळले नाही. अवधूत म्हणाला कि खूप कंट्रोल आवाजात गायलीस. "ध" मिळाला.





दुसरे गाणे झाले मृण्मयी तीरोडकरचे "माझ्या सारंगा राजा सारंगा". श्वास पुरत नव्हता असे वाटत होते. खालचे सूर नीट लागले नाही. गाणं चांगले झाले असे परीक्षकांचे मत होते. "प" मिळाला.





तिसरे गाणं म्हणायला आली श्रुती विश्वकर्मा "नाही कशी म्हणू तुला". श्वास नीट पुरत नव्हता खालचे सूर स्थिर लागत नव्हते. सलीलच्या मते गाणं म्हणत असताना चिंता करत असल्याने काही जागा नीट आल्या नाहीत. रोनुच्या मते relax होऊन गाणं म्हणायला हवे होते. "प" मिळाला.





मध्ये मध्ये कार्तिकीनी पण गाणी म्हटली, कार्तीकीने तिचे प्रसिध्ध "घागर घेऊन निघाली पाण्या गौळण" म्हटले. पण का कोण जाणे मला हिचे वरचे नोटस नेहमीच ओरडल्यासारखे वाटतात. तसे आजही वाटले.






चौथे गाणे सदर करायला सागर जाधवने मराठी गाणं सदर केले. "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी". गाणं खूप छान म्हटले. सगळे भाव अगदी आतून आले. ध मिळाला.




आजच्या भागातील शेवटचे मराठी गाणं म्हणायला आली उर्मिला धनगर. "हुरहूर असते तीच उरी", गाणं चांगले म्हटले. पण उर्मिलाच्या गाण्याला येते तितकी मजा आली नाही. सलीलच्या मते फक्त ९८% गायली. रोणूने पण त्याच प्रकारची comment दिली. सलीलने मुग्धाच्या गाण्याचा उल्लेख केला. सारखे कार्तिकी कार्तिकी ऐकल्यावर मुग्धाचे नाव घेतल्यावर जरा चांगले वाटले. "नी" मिळाला.







Today is the second week of the semifinal round. Rest of the 9 participants are going to sing. Pattern remains the same as last week. Today program started with Kartiki Gayakwad's "Krishne vedhili virahani bole". Today's special judge is famous flute player "Ronu Mujumdar". Actual competition started with Susmirata Dawalkar's "Bheti lagi jeeva lagalise aas". Second song was by Mrunmayi Tirodkar "mazya saranga raja saranga". Third song was by Shruti vishkarma "nahi kashi mhanu tula". In between, Kartiki sung one more song "ghagar gheun nighali panya gaulan". Then Sagar Jadhav performed "Tya kovlya phulancha bajar pahila mi". Last marathi song was by Urmila Dhangar "Hurhur asate tich uri".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दुसर्या राउंड नंतर होण्याऱ्या Knock Out Round चा आज दुसरा दिवस. आज पुन्हा ६ उभरते गायक. काल ३ स्पर्धक उपांत्य फेरीत गेले. आता आज बघायचे किती पुढे जातात. आजचे मान्यवर परीक्षक होते सुरेश वाडकर. आजच्या कार्यक्रमाची सुरवात "कोटी कोटी रुपु तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. " या सुरेश वाडकरांच्या गाण्याने झाली.



स्पर्धेची सुरवात मोना कामतच्या गाण्याने झाली. "प्रभाती सूर नभी रंगती" हे गाणं तिने चांगले म्हटले. गाणं खूप सुरात झाले नाही असे सलीलचे मत होते आणि सुरेश वाडकर म्हणाले कि गाणं भिजलेले हवे, फक्त सुरात म्हणत होती गाण्यात ओलावा नव्हता. अवधूतचे पण मत असेच काहीसे होते. आज मार्क मिळणार नव्हते तर शेवटी एकदम निकाल.



दुसरे गाणं म्हणायला मंचावर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. याने "संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतं". मध्ये मध्ये बेसूर झाला. मधला एक आलाप जमला नाही. सगळ्याच्या मते गाणं चांगले म्हटले पण सुरांकडे थोडे लक्ष द्यायला हवे असे मत होते.




तिसरं गाणं स्वप्नील चाफेकरचे "माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद" झाले. श्रीधर फडकेचे संगीत असलेली हि रचना अत्युत्तम आहे. सुरेश वाडकरांच्या मते सुराला खूप धरून नव्हते. सलीलचे असे मत होते कि रसनिष्पत्ती नीट झाली नाही. अवधूतने पण तेच सांगितले.



चौथे गाणे मृण्मयी तिरोडकरचे "वाट पाहुनी जीव शिणला दीसामागून दिस टळला." आवाज खूप छान लागला होता. गाणं अप्रतिम झाले असे तिघांचे पण मत होते. सलीलच्या मते एक सूर नीट लागला नाही पण नंतर सगळे गाणं सुरात आले.




पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "काही बोलायचे आहे पण बोलणार नाही" कुसुमाग्रजांचे गीत, त्याला यशवंत देवांचे संगीत आणि अरुण दातेचा स्वर असलेला हे गाणं तसा पेलायला कठीण आहे. माझ्या मते सगळे "नाही" नीट आले नाहीत. त्याचे उच्चार चांगले वाटले नाहीत. भाव नीट आले नाही असे सगळ्या परीक्षकांचे मत होते.





सहावे गाणं सागर जाधवने म्हटले. "दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो, कशी नशिबाने थट्टा आज मांडली". त्याने खूपच मस्त म्हटले. याच्या आवाजाला हे गाणं खूपच साजेशे होते. आणि त्याने अगदी संपूर्ण न्याय दिला गाण्याला असा मला वाटले. सलीलच्या मते अगदी भावपूर्ण झाले. अवधूतने नेहमीप्रमाणे तोडलंस, फोडलास असे मत दिले.



Today is the second day of the "knock out round". Today everyone will sing two song and judges will give marks only on that song. Result will be there at the end. Yesterday 3 participant went in the next round. Today's judge was Suresh Wadkar. Program starts by his song "Koti koti rupe tuzi, koti surya chandra tare".

Knock round starts by Mona Kamat's "Prabhati sur nabhi rangati". Next song was by Prasanna Prabhu Tendulkar "Sant bhar pandharicha". Third song was sung by Swapnil Chafekar, "Mazya mana lago chand, nitya govind". Forth song was by Mrumnayi Tirodkar "Waat pahuni jeev shinala". Then came Shrirang Joshi and performed "Kahi bolayache aahe pan bolnar nahi". Sixth song was by Sagar Jadhav, "Kashi nashibane thatta aaj mandali".

Now one more song will be performed by each participant and then result will be announced.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

दुसरं गाणं सादर करायला प्रथम आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. त्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". खूपच मनापासून गाणं म्हटले असे वाटत होते. सलीलला खूप आवडले आणि विशेष म्हणजे आवाजाची नक्कल न करता गायलीस याबद्दल कौतुक करण्यात आले. सुरेश वाडकरांच्या मते काही जागा अस्पष्ट येतात. अवधूतच्या मते पण गाणं खूप छान झाले.




त्यानंतरचे गाणं गायला आला स्वप्नील चाफेकर. त्याने "प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती जोडू अमोल नाती ये ना " हे गाणं म्हटले. गाणं एकदम उडत्या चालीचे आहे. गाणं चांगले झाले असे सगळ्यांचे मत होते. मल्लिका शेरावत नऊवारी घातल्यावर ती जितकी लाजणार नाही तितका हा लाजत होता असा शेरा अवधूतचा होता. सलीलच्या मते गाणं चांगले म्हटले आणि सुरेश वाडकरांचे पण तेच मत होते.




तिसरा गाणं म्हणायला आली मृण्मयी तिरोडकर. हिने "लवलव करी पातं डोळा नाही थार्याला" माझ्या मते सुरवात इतकी छान झाली नाही. नंतर मात्र चांगले म्हटले. सलीलचे उदाहरण खूप मस्त असतात. तो म्हणाला कि तू तुझ्या मानानी नाचलीस वगैरे. सुरेश वाडकरांनी तिला काही बदल सुचवले. अवधूतने काही विशेष मत दिले नाही.




चौथं गाणं मोना कामातचे "मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतीने धुंद झाले". तिला वरचे स्वर गायला त्रास होत होता असे वाटत होते. कदाचित थोडे खाली घेतले असते तर ठीक झाले असते. गाणं चांगलं झाले असे अवधूत म्हणाला. सुरेश वाडकर म्हणाले कि तुला अजून मेहनत करायला हवी कारण गाण्याचा आत्मा हरवला आहे आहे वाटत होते. सलील म्हणाला कि मागच्या पेक्षा चांगले झाले पण सगळे मिळून चांगलं व्हायला हवा तसे झाले नाही.





पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "हा छंद जीवाला लावी पिसे " सुरवात या गाण्याची अशी आहे कि त्यात सगळे तुम्ही किती तयार आहात गाण्यात हे दिसून येते. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. स्वर खूप ठिकाणी जात होते. सलीलच्या मते या गाण्यात श्रीरंग चा उत्साह जरा जास्त झाला आणि त्यामुळे सूर गेले. सुरेश वाडकरांचे मत पण काहीसे तसेच होते. अवधूतचे मत तसे होते पण तो म्हणाला कि वयाच्या मानानी चांगले गायलास.





सहावे गाणं म्हणायला आला सागर जाधव. "लिंगोबाचा डोंगुर आबाळी गेला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला". सागरच्या आवाजात अशी गाणी खूप छान होतात. अवधूत म्हणाला कि खूप छान गाणं म्हणून स्पर्धा संपवली आहे. सुरेश वाडकर म्हणाले कि छान म्हटले आणि सलीलचे पण मत तसेच होते.




आता निकाल. प्रसन्ना श्रीरंग आणि मृण्मयी सलीलच्या गटात होते. मृण्मयी आणि प्रसन्ना सलीलच्या गटातून पुढे गेली. अवधूतच्या गटात स्वप्नील, मोना आणि सागर. त्याच्या गटातून सागर पुढे गेला.





कार्यक्रमाची सांगता सुरेश वाडकरांच्या "गुरु एक जगी त्राता". या गाण्याने झाली.





First song in the second round of this part was by Prasanna Prabhu Tendulkar. He sung "Disalis tu phulale rutu". Second song was by Swapnil chafekar. He sung "Pritichya chandarati gheuni hat hati gheuni hat hati jodu amol nati ye na". Then came Mrunmayi Tirodkar. She sung "Lavlav kari paata dole nahi tharyala". Forth song was by Mona Kamat, "mi varyachya vegane aale, tuzya pritine dhund zale" Fifth song was by Shrirang Joshi, "ha chhand jeevala lavi pise". Sixth song was by Sagar Jadhav. "Lingobacha dongur abali gela". Now the result, Mrunmayi Tirodkar, Prasanna prabhu Tendulkar and Sagar Jadhav went in the next round. End of the program was by Suresh wadkar's song "Guru ek jagi trata".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

पुढील फेरीमध्ये २४ स्पर्धक आले आहेत. त्यातील १२ स्पर्धक मागील आठवड्यात गायले आणि आज पुढील १२ गाणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "सावनी शेंडे". हि शास्त्रीय संगीतात खूपच प्रसिध्ध आहे. आज एकूण ६ स्पर्धक आहेत प्रत्येक स्पर्धक २ गाणी सदर करणार आहेत.

आजच्या स्पर्धेची सुरवात सागर जाधवच्या "गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" या गाण्याने झाली. गाणं त्याच्या आवाजात खूप छान वाटत होते. सगळ्या परीक्षकांनी त्याची वाहवा केली पण मार्क "प" मिळाले.





दुसरं गाणं अश्विनी देशपांडेचे होते. तिने "अगा करुणाकरा" हे गाणं म्हटले. गाणं चांगले म्हटले. अवधूतच्या मुंगीच्या शेपटीवरील ढेकुण म्हणजे अतीच झाले. गाणं अप्रतिम होतं असा सलीलचा शेरा होतं. "ध" मिळाला.





तिसरं गाणं सुस्मिरता दवाळकरचे झाले. "बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव". जीव आणि भाव ओतून म्हटले. खूप छान म्हटले. अवधूत प्रथमच अध्यात्मावर बोलला. मला नीटसे कळलं नाही. पण त्यावर सलीलचे मत पटणारे होते. "ध" मिळाला. एका ठिकाणी उच्चार चुकले होते.





चौथे गाणं होते मृण्मयी तिरोडकरचे. हि अपक्ष उमेदवार होती मागील भागात. हिने "डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली" हे गाणं म्हटले. सावनीच्या मते पहिली ओळ खूप सुरात येते आणि तीच ओळ परत म्हटली कि कुठेतरी बेसूर होते. आणि अवधूतच्या मते ती घाबरली होती. पण तरीही तिला "ध" मिळाला.





पाचवे गाणं स्वरदा गोखले चे "नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला". सुरवातीला स्वर हलले असे सलीलचे मत होते. सगळ्या परीक्षकांनी कौतुक केले. "ध" मिळाला.





सहावे गाणे "चांदण्या रात्रीतली ती स्वप्ना तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा" हे मोना कामतने म्हटले. माझ्या मते खालचे स्वर जरा कापत होते. पण गाणं चांगले होते. सलीलला खूप आवडले नाही. कारण त्याच्या मते भाव नीट आले नाही. "प" मिळाला.



Today was the second week of the second round. Last week 12 participant had performed and this week next 12 will perform. Today, out of this 12, 6 will present 2 songs each. Today's special judge was Savani Shende. She is one of the blooming Hindustani classical singer in today's era. The episode started with the song "Gaon jagavit aali vasudevachi swari". Song was performed by Sagar Jadhav. Sagar got "pa". The second was by Ashwini Deshpande, Aga Karuna Kara. She got "dha" for this performance. Third song was by Susmirata Davalkar, "Bolava Viththal, pahava viththal", She got "dha" for this. Forth song was by Mrunmayi Tirodkar, "Dolyavarun mazya utarun ratra geli". Performed very well and received "dha". Fifth song was by Swarada Gokhale, "Thakale re nandalala". Very well sung, received "dha". The last song was by Mona Kamat, "Chandanya ratritali ti swapna tu visarun ja". As per the judges she was little tensed and that is why performance was not upto the mark. She received "pa". So in the first round of today, Sagar Jadhav and Mona Kamat was trailing. Now let us see what happens in the next performance.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

आता आजच्या भागातील गाणं म्हणण्याची दुसरी संधी. पुन्हा सागर जाधव गाणं गायला येतो. "या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे". मंगेश पाडगावकरांचे अजरामर गाणं. सागरने खूपच छान म्हटले. "ध" मिळाला.





नंतरचे गाणं मृण्मयी तिरोडकर "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती गं" सलीलच्या मते गाणं घाबरल्यासारखे झाले. सावनीचे मत तसेच होते, कि सुराला कमी जास्त होतं. अवधूतच्या मते हिच्या आवाजाला हे गाणं योग्य होतं. तिला "प" मिळाला.






नववे गाणं, "शंभो शंकरा, करुणाकरा " स्वरदा गोखलेच्या आवाजात. अवधूतच्या मते हिचा आवाज खूप गोड आहे. अवधूतच्या उपमा काहीही असतात असे आता जाणवले. सावनीच्या मते सुरवातीला जास्त छान झाले नंतर, कुठेतरी गाणं निसटले. सलीलला पण तसेच वाटले. तिला "प" मिळाला.





दहावे गाणं सुस्मारिता दवाळकारच्या आवाजात "नको रे नंदलाला ". सगळ्या परीक्षकांच्या मते हिने खूप छान म्हटले आणि गाण्यातले फरक चांगले दाखवून दिले. एक नोट वर चालले असते असा सगळ्यांचा सूर होता. "ध" मिळाला.





११ वे गाणं मोना कामातचे "अंगणी माझ्या मनाच्या मोर दाटू लागले". सलीलच्या मते जागा घेताना कष्ट पडत होते. पण एकूण गाणं चांगल झाले. पुन्हा "प" मिळाला.





शेवटचे गाणे "गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी" हे अश्विनी देशपांडेचे झाले. मला धृवपद जरा नाकातून वाटले. सलीलच्या मते श्वास पूरत नव्हता. सावनी म्हणाली कि हे गाणं कठीणच आहे पण तरीही तिला ते आवडले. खालचे स्वर नीट लागले नाहीत असा अवधूतचा शेरा होता. "प" मिळाला.





आता निकाल. दोन्ही गाणी ज्यांची चांगली झाली तेच पुढे जाणार असं ठरले होते त्यानुसार सुस्मिरता दवाळकर आणि स्वरदा गोखले पुढे गेल्या. आणि आजचा "बेस्ट पेर्फोर्मेर" म्हणून स्वरदा गोखलेला निवडले गेले. सावनीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.






Now the second song performance by all the participants. Sagar Jadhav sung "ya janmavar ya jaganyavar". Next song was by Mrunmayi Tirodkar "balagu kashala vyartha kunachi bhiti ga". After that Swarada Gokhale performed "Shambho shankara". Susmita Davalkar's "nako re nandalala" was the next song. and then Ashwini Deshpande sung "tu tar chaphekali". And then in the result, only 2 people went ahead, Swarada Gokhale and Susmirata Davalkar. Swarada Gokhale received the best performer award.