Showing posts with label Suresh Wadkar. Show all posts
Showing posts with label Suresh Wadkar. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दुसर्या राउंड नंतर होण्याऱ्या Knock Out Round चा आज दुसरा दिवस. आज पुन्हा ६ उभरते गायक. काल ३ स्पर्धक उपांत्य फेरीत गेले. आता आज बघायचे किती पुढे जातात. आजचे मान्यवर परीक्षक होते सुरेश वाडकर. आजच्या कार्यक्रमाची सुरवात "कोटी कोटी रुपु तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. " या सुरेश वाडकरांच्या गाण्याने झाली.



स्पर्धेची सुरवात मोना कामतच्या गाण्याने झाली. "प्रभाती सूर नभी रंगती" हे गाणं तिने चांगले म्हटले. गाणं खूप सुरात झाले नाही असे सलीलचे मत होते आणि सुरेश वाडकर म्हणाले कि गाणं भिजलेले हवे, फक्त सुरात म्हणत होती गाण्यात ओलावा नव्हता. अवधूतचे पण मत असेच काहीसे होते. आज मार्क मिळणार नव्हते तर शेवटी एकदम निकाल.



दुसरे गाणं म्हणायला मंचावर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. याने "संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतं". मध्ये मध्ये बेसूर झाला. मधला एक आलाप जमला नाही. सगळ्याच्या मते गाणं चांगले म्हटले पण सुरांकडे थोडे लक्ष द्यायला हवे असे मत होते.




तिसरं गाणं स्वप्नील चाफेकरचे "माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद" झाले. श्रीधर फडकेचे संगीत असलेली हि रचना अत्युत्तम आहे. सुरेश वाडकरांच्या मते सुराला खूप धरून नव्हते. सलीलचे असे मत होते कि रसनिष्पत्ती नीट झाली नाही. अवधूतने पण तेच सांगितले.



चौथे गाणे मृण्मयी तिरोडकरचे "वाट पाहुनी जीव शिणला दीसामागून दिस टळला." आवाज खूप छान लागला होता. गाणं अप्रतिम झाले असे तिघांचे पण मत होते. सलीलच्या मते एक सूर नीट लागला नाही पण नंतर सगळे गाणं सुरात आले.




पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "काही बोलायचे आहे पण बोलणार नाही" कुसुमाग्रजांचे गीत, त्याला यशवंत देवांचे संगीत आणि अरुण दातेचा स्वर असलेला हे गाणं तसा पेलायला कठीण आहे. माझ्या मते सगळे "नाही" नीट आले नाहीत. त्याचे उच्चार चांगले वाटले नाहीत. भाव नीट आले नाही असे सगळ्या परीक्षकांचे मत होते.





सहावे गाणं सागर जाधवने म्हटले. "दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो, कशी नशिबाने थट्टा आज मांडली". त्याने खूपच मस्त म्हटले. याच्या आवाजाला हे गाणं खूपच साजेशे होते. आणि त्याने अगदी संपूर्ण न्याय दिला गाण्याला असा मला वाटले. सलीलच्या मते अगदी भावपूर्ण झाले. अवधूतने नेहमीप्रमाणे तोडलंस, फोडलास असे मत दिले.



Today is the second day of the "knock out round". Today everyone will sing two song and judges will give marks only on that song. Result will be there at the end. Yesterday 3 participant went in the next round. Today's judge was Suresh Wadkar. Program starts by his song "Koti koti rupe tuzi, koti surya chandra tare".

Knock round starts by Mona Kamat's "Prabhati sur nabhi rangati". Next song was by Prasanna Prabhu Tendulkar "Sant bhar pandharicha". Third song was sung by Swapnil Chafekar, "Mazya mana lago chand, nitya govind". Forth song was by Mrumnayi Tirodkar "Waat pahuni jeev shinala". Then came Shrirang Joshi and performed "Kahi bolayache aahe pan bolnar nahi". Sixth song was by Sagar Jadhav, "Kashi nashibane thatta aaj mandali".

Now one more song will be performed by each participant and then result will be announced.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

दुसरं गाणं सादर करायला प्रथम आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. त्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". खूपच मनापासून गाणं म्हटले असे वाटत होते. सलीलला खूप आवडले आणि विशेष म्हणजे आवाजाची नक्कल न करता गायलीस याबद्दल कौतुक करण्यात आले. सुरेश वाडकरांच्या मते काही जागा अस्पष्ट येतात. अवधूतच्या मते पण गाणं खूप छान झाले.




त्यानंतरचे गाणं गायला आला स्वप्नील चाफेकर. त्याने "प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती जोडू अमोल नाती ये ना " हे गाणं म्हटले. गाणं एकदम उडत्या चालीचे आहे. गाणं चांगले झाले असे सगळ्यांचे मत होते. मल्लिका शेरावत नऊवारी घातल्यावर ती जितकी लाजणार नाही तितका हा लाजत होता असा शेरा अवधूतचा होता. सलीलच्या मते गाणं चांगले म्हटले आणि सुरेश वाडकरांचे पण तेच मत होते.




तिसरा गाणं म्हणायला आली मृण्मयी तिरोडकर. हिने "लवलव करी पातं डोळा नाही थार्याला" माझ्या मते सुरवात इतकी छान झाली नाही. नंतर मात्र चांगले म्हटले. सलीलचे उदाहरण खूप मस्त असतात. तो म्हणाला कि तू तुझ्या मानानी नाचलीस वगैरे. सुरेश वाडकरांनी तिला काही बदल सुचवले. अवधूतने काही विशेष मत दिले नाही.




चौथं गाणं मोना कामातचे "मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतीने धुंद झाले". तिला वरचे स्वर गायला त्रास होत होता असे वाटत होते. कदाचित थोडे खाली घेतले असते तर ठीक झाले असते. गाणं चांगलं झाले असे अवधूत म्हणाला. सुरेश वाडकर म्हणाले कि तुला अजून मेहनत करायला हवी कारण गाण्याचा आत्मा हरवला आहे आहे वाटत होते. सलील म्हणाला कि मागच्या पेक्षा चांगले झाले पण सगळे मिळून चांगलं व्हायला हवा तसे झाले नाही.





पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "हा छंद जीवाला लावी पिसे " सुरवात या गाण्याची अशी आहे कि त्यात सगळे तुम्ही किती तयार आहात गाण्यात हे दिसून येते. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. स्वर खूप ठिकाणी जात होते. सलीलच्या मते या गाण्यात श्रीरंग चा उत्साह जरा जास्त झाला आणि त्यामुळे सूर गेले. सुरेश वाडकरांचे मत पण काहीसे तसेच होते. अवधूतचे मत तसे होते पण तो म्हणाला कि वयाच्या मानानी चांगले गायलास.





सहावे गाणं म्हणायला आला सागर जाधव. "लिंगोबाचा डोंगुर आबाळी गेला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला". सागरच्या आवाजात अशी गाणी खूप छान होतात. अवधूत म्हणाला कि खूप छान गाणं म्हणून स्पर्धा संपवली आहे. सुरेश वाडकर म्हणाले कि छान म्हटले आणि सलीलचे पण मत तसेच होते.




आता निकाल. प्रसन्ना श्रीरंग आणि मृण्मयी सलीलच्या गटात होते. मृण्मयी आणि प्रसन्ना सलीलच्या गटातून पुढे गेली. अवधूतच्या गटात स्वप्नील, मोना आणि सागर. त्याच्या गटातून सागर पुढे गेला.





कार्यक्रमाची सांगता सुरेश वाडकरांच्या "गुरु एक जगी त्राता". या गाण्याने झाली.





First song in the second round of this part was by Prasanna Prabhu Tendulkar. He sung "Disalis tu phulale rutu". Second song was by Swapnil chafekar. He sung "Pritichya chandarati gheuni hat hati gheuni hat hati jodu amol nati ye na". Then came Mrunmayi Tirodkar. She sung "Lavlav kari paata dole nahi tharyala". Forth song was by Mona Kamat, "mi varyachya vegane aale, tuzya pritine dhund zale" Fifth song was by Shrirang Joshi, "ha chhand jeevala lavi pise". Sixth song was by Sagar Jadhav. "Lingobacha dongur abali gela". Now the result, Mrunmayi Tirodkar, Prasanna prabhu Tendulkar and Sagar Jadhav went in the next round. End of the program was by Suresh wadkar's song "Guru ek jagi trata".