पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत आणि ३ स्पर्धक गेले कि महाअंतिम फेरी सुरु होणार आहे. सुरवातीला मार्काप्रमाणे गायक गाणं सादर करतील. आज एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार आहे.

सलील आणि अवधूतच्या मते प्रथम तिघे अभिलाषा, उर्मिला आणि राहुल असावेत. प्रथम क्रमांकावर होती, अभिलाषा चेल्लम. अभिलाषाने "रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते". मुळ गायिका परवीन सुलताना गीत गंगाधर महाम्बरे, संगीत राम फाटक. या गाण्यात अभिलाषाचे उच्चार मराठी वाटले नाहीत. विशेषता "एक" "दाटलेले" हे शब्द नीट आले नाहीत. गाणं सुराला हलले असे अवधूतचे मत होते.



दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. त्याने "स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे" मुळ गायक शंकर महादेवन, गीत मंगेश कुलकर्णी, संगीत केदार पंडित, अल्बम श्रावणधारा. गाणं ठीक झाले. मुळ गाण्याचे बोल इतके खूप छान आहेत असे मला वाटले नाही. राहुल कडव्यातील काही शब्द विसरला. गाणं खूप गंभीर झाले असे सलीलचे मत होते. अवधूतची उपमा छान होती.




तिसऱ्या क्रमांकावर होती अपूर्वा गज्जाला होती. हिने "प्रतिमा उरी धरुनी मी प्रीती गीत गाते" मुळ गायिका लता मंगेशकर, गीत डी व्ही केसकर, संगीत वसंत प्रभू. सुरवातीच्या आलापात स्वर स्थिर लागले नाहीत. गाणं चांगले झाले.



चौथ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "तू माझी माउली कल्पवृक्षाची सावली" मुळ गायक व संगीत छोटा गंधर्व, रचना संत तुकाराम. गाणं खूपच भावपूर्ण म्हटले. चांगले झाले. गाणी स्पर्धक निवडत नाहीत, तर झीची रिसर्च टीम त्यांना गाणी शोधून देते हे आज या गाण्यानंतर कळले.



स्वरदा गोखले आणि मृण्मयी तिरोडकर या दोघींना सगळ्यात कमी मार्क मिळाले. त्यात प्रथम स्वरदाला बोलावण्यात आले. "नयन तुजसाठी आतुरले" मुळ गायिका जोत्स्ना हर्डीकर, गीत वंदना विटणकर, संगीत अनिल मोहिले. काही ठिकाणी सूर गेले असे अवधूतचे मत होते. पण तरीही गाणं खूप छान झाले असे मत होते. पण स्वरदाच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत होती परीक्षकांचे मत ऐकताना असे वाटले.




शेवटचे गाणं सादर करायला आली मृण्मयी तिरोडकर. "माझ्या मना रे ऐक रे जरा हळवेपणा हा नाही खरा", मुळ गायिका बेला शेंडे, गीत शांता शेळके, संगीत सलील कुलकर्णी, अल्बम "माझ्या मना"




Today there are 6 participants. Mega final will start when only 3 participants remains. As per the marks, participants came and presented song. First was Abhilasha Chellam she sung, Rasika tuzyachsathi mi ek geet gate. Second was by Rahul Saksena "swapnat pahilelya nagarit dur kothe". Third song was by Apurva Gajjala. She presented "pratima uti dharuni mi priti geet gate". Forth song was Urmila Dhangar sung "tu mahi mauli kalpavrukshachi savali". Bottom 2 were Mrunmayi Tirodkar and Swarada Gokhale. Swarada Gokhale sung "nayan tuj sathi aturale". Mrunmayi Tirodkar sung "mazya mana re eik jara, halavepana ha nahi khara".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २८ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

दुसऱ्या रौऊड साठी लोकगीत म्हणणार आहेत. मताप्रमाणे प्रथम क्रमांकावर होती स्वरदा गोखले. हिने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हावारी" मुळ गायिका शैला चिखले, गीत काशीराम चिंचय, विश्वनाथ चिंचय, संगीत विजय कठीण. हे एक कोळीगीत आहे. पारू ग पारू वेसावची पारू या अल्बममधील हे गाणं आहे. कोरस मध्ये अभिलाषा, अपूर्वा, उर्मिला, मृण्मयी होत्या.




मतांच्या प्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर, हिने "चल रे शिरपा देवाची क्रीपाची औंदा छान" मुळ गायक जयवंत कुलकर्णी, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत प्रभाकर जोग चित्रपट आंधळा मारतो डोळा. आवाज थरथरत होता असा वाटत होते. गाणं ठीक झाला. खूप छान झाले असे वाटले नाही.




तिसऱ्या क्रमांकावर उर्मिला धनगर होती. हिने "पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसाव शालू नवा" हे गाणं सदर केले. लावणी आहे. सुलोचना चव्हाण मुळ गायिका, गीत ग. दि. माडगुळकर, संगीत वसंत पवार, चित्रपट मल्हारी मार्तंड. गाणं मस्त झाले. अवधूतच्या काय कॉमेंटस होत्या त्याला तरी कळल्या कि नाही देव जाणे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. हिने पारंपारिक जोगवा सादर केला, "अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मोहू महिषासुर मर्दना लागली" रचना संत एकनाथ. कोरस मध्ये होत्या मृण्मयी, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा. गाणं एकदमबेस्ट.




पाचव्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. ह्याने करूया उदो उदो उदो अंबाबाईचा. हा एक गोंधळ आहे. मुळ गायक प्रल्हाद शिंदे, गीत मधुकर ठाकूर संगीत मधुकर पाठक. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अभिलाषा आणि मृण्मयी होत्या. गाणं चांगले म्हटले.हा मधूनच काही शब्द विसरला. पण तरीही गाणं पुढे म्हटले.



सहाव्या क्रमांकावर आली अपूर्वा गज्जला. हिने एक भजन सादर केले "एक तत्व नाम दृढ धरी मना" मुळ गायक यशवंत निकम गीत शांताराम आठवले संगीत केशवरावभोळे चित्रपट संत ज्ञानेश्वर. गाणं खूपच छान झाले.







आता एलिमिनेशन. आज एक जण बाहेर जाणार आहे. आजच्या निकालाप्रमाणे मृण्मयी बाहेर पडली. सगळ्या स्पर्धकांचे मार्क खालीलप्रमाणे.
स्वरदा गोखले मार्क ८७.३३ मत ४५.६५
अभिलाषा चेल्लम, मार्क ९४.१७ मत १०.७७
उर्मिला धनगर मार्क ९१.२५ मत ११.२८
अपूर्वा गज्जला मार्क ९२.३३ मत ८.८८
राहुल सक्सेना मार्क ९३.५८ मत ५.८६
मृण्मयी तिरोडकर मार्क ८१.५० मत १७.५६





Second round was of folk song. In this round, participant came as per the SMS they received. First was Swarada Gokhale. She sung "ekavira aai tu dongaravari najar hay tuzi kolhavari". This is koligeet. Second was Mrunmayi Tirodkar. She presented "chal re shirpa devachi kirpa". Third song was by Urmila Dhangar. She sung "padaravarati jartaricha mor nachara hava". This is Lavani. Forth song was by Abhilasha Chellam. She sung "Anadi nirgun pragatali bhavani". This is Paramparik jogva. Fifth song was by Rahul Saksena. "karu ya udo udo udo ambabaicha". This is Gonghal. "Sixth song was Apruva Gajjala. She sung bhajan. "ek tatva naam dhrudh dhari mana". Last was eliminations. Today Mrunmayi Tirodkar was eliminated. Marks are as Below

Swarada Gokhale, mark 87.33 SMS 45.65
Abhilasha Chellam, mark 94.17 SMS 10.77
Urmila Dhangar, mark 91.25 SMS 11.28
Apurva Gajjala, mark 92.33 SMS 8.88
Rahul Saksena, mark 93.58 SMS 5.86
Mrunmayi Tirodkar, mark 81.50 SMS 17.56

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आता ६ स्पर्धक आहेत. परीक्षकांचे मार्क ५०% तर SMS ५०% असे प्रमाण आहे. शंतनू मोहित्रा हे आजचे मान्यवर परीक्षक आहेत. प्रथम अभिलाषा चेल्लाम सादर करायला आली कैसी पहेली है ये जिन्दगानी. मुळ गायिका सुनिधी चौहान, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शंतनू मोहित्रा चित्रपट परिणीता. अभिलाषाला काल सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते. अभिलाषाला दोन वरचे "सा" मिळाले. अर्थात शांतनू मोहित्राचे मार्क दाखवण्यात आले नाहीत.




त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याने "लागा चुनरी में डाग छुपाऊ कैसे" हे गाणं सादर केले. मुळ गायक मन्ना डे, गीत साहीर लुधियानवी, संगीत रोशन चित्रपट "दिल हि तो है". गाणं चांगल झाले. भाव जरा कमी आले असा मोहित्राचे मत होते. अवधूतने वरचा सा तर सलीलने नी दिला. आजकाल पल्लवी राहुलशी मराठीत बोलते.




तिसरा क्रमांक होता उर्मिला धनगरचा. "बाबूजी धीरे चलना". मुळ गायिका गीता दत्त. गीत मजरूह सुलतानपुरी. संगीत ओ.पी. नय्यर, चित्रपट आर पार. गाणं ठीक होते. अवधूतला आता उर्मिलाच्या त्याच त्याच धाटणीच्या गाण्याचा कंटाळा आला आहे असा दिसतंय. तो पुन्हा म्हणाला कि जरा वेगळे गाणं म्हण. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




चवथा क्रमांक होता अपूर्वा गज्जलाचा. हिने "रैना बीती जाये, शाम न आये". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत आर. डी. बर्मन. चित्रपट अमर प्रेम. दोन वरचे सा.




पाचवा क्रमांक होता मृण्मयी तीरोडकरचा. "पियू बोले पिया बोले", मुळ गायिका श्रेया घोषाल, गीत स्वानंद किरकिरे, संगीत शांतनू मोहित्रा, चित्रपट परिणीता. गाणं खूप छान झाले नाही. सुरवात तर खूपच घसरली. दोन नी मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले. "रात अकेली है, बुझ गये दिये". मुळ गायिका आशा भोसले, गीत मजरूह सुलतानपुरी, संगीत एस. डी. बर्मन. चित्रपट ज्वेल थीफ. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. खूपच लाडिक झाले. दोन ध मिळाले.




Today 6 participants are remaining in the competition. Now percentage of SMS is 50% and marks is 50%. Todays special guest is Shaantanu Mohitra. First round was of hindi songs. Abhilasha chellam presented "kaisi Paheli hai ye jindagani". Then came Rahul Saksena, who performed Laga chunari me daag chhupau kaise". Third was Urmila Dhangar, who sung "babuji dheere chalana". Then Apurva Gajjala sung "raina beeti jaaye sham na aaye" Bottom tow were Mrunmayi and Swarada. Mrunmayi Tirodkar presented "piyu bole piya bole". Last song in the first round was presented by Swarada Gokhale "raat akeli hai buz gaye diye".




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २२ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


"कंठातच रुतल्या कान्हा कुठे ग बाई कान्हा" हे गाणं अभिलाषा चेल्लामने सदर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे, संगीत श्रीनिवास खळे यांचे. गाणं खूपच छान म्हटले. हिचे उच्चार इतके सुंदर आहेत कि हि तमिळ आहे असे वाटतच नाही. ह्या गाण्यात अजिबातच श्वास घ्यायला जागा नाहीये म्हणजे खूप कठीण आहे म्हणायला.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का", मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी सावळाराम संगीत वसंत प्रभू यांचे. ही कशी काय eliminate झाली असा प्रश्न पडला शांतनूला.




"आज कुणीतरी यावे" हे गाण सादर करायला आली स्वरदा गोखले. मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर संगीत सुधीर फडके. चित्रपट मुंबईचा जावई. गाणं चांगला झालं. सूर खूपच छान लागले होते. अवधूत आणि सलीलची जुगलबंदी मस्तहोती.




मग आली मृण्मयी तिरोडकर, "वादल वार सुटलं ग". मुळ गायिका लता मंगेशकर गीत शांत शेळके संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर., गीत शिल्प या अल्बम मधील हे गाणं आहे. रेडीओ वर गाणं म्हटलंय असा वाटले असे सलीलचे म्हणणे होते. शंतनुने दिलेल्या सूचना खूपच चांगल्या होत्या.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, "कस काय पाटील बर हाय का काल काय ऐकले ते खरं हाय काय". मुळ गायिका सुलोचना चव्हाण, गीत जगदीश खेबुडकर, संगीत वसंत पवार चित्रपट सवाल माझा ऐका. कोरसला अपूर्वा, स्वरदा, अभिलाषा, राहुल आणि मृण्मयी होते. उर्मिलाच्या आवाजाला कुकरची उपमा फक्त अवधूतच देऊ शकतो.




मग आला राहुल सक्सेना "ये गो ये मैना ". मुळ गायक अजय गोगावले गीत व संगीत अजय- अतुल चित्रपट जत्रा. सत्तुने सुरवातीला साथ दिली मस्त होती. त्यावर अवधूतची कॉमेंट पण मस्त.




आता बेस्ट पेर्फोर्मेर सांगण्याची वेळ आली आहे. शांतनू मोहित्राच्या मते सगळ्यात छान गाणं अपूर्वा गज्जलाचे झाले.





Then marathi song round started. This round was based on SMS. Abhilasha Chellam sung "kanthatch rutalya tana". Then Apurva Gajjala, "hrudayi jaga tu anuraga pritila ya deshil ka ". Swarada Gokhale sung "aaj kunitari yaave". Mrunmayi Tirodkar presented "vadal wara sutala ga" Urmila Dhangar sung "kasa kaay patil bar hay ka kaal kaay eikale te khara hay kay". Rahul Saxena presented "ye go ye ye maina". Today there is no elimination, so Best Performer was announced. Shaantanu Mohitra felt best performer was APurva Gajjala.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ६ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील आठवड्यात "Call back" असल्यामुळे या आठवड्यात कोणीच बाहेर पडणार नाहीये. आज प्रथम फेरी तालावर आधारित होती. सगळ्या स्पर्धकांनी आज तालावर अधातीर गाणी म्हटली. आजचे मान्यवर परीक्षक होते, पं. सुरेश तळवलकर.

कार्यक्रमाला सुरवात केली स्वरदा गोखले हिने. स्वरदाने भजनी तालावरील गाणे सादर केले. "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी." हे गाणं सादर केले. ताल भजनी, मुळ गायिका फैयाज, रचना संत गोरा कुंभार, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक गोरा कुंभार. गाणं चांगले झाले. सलीलने प तर अवधूतने ध दिला. पं. सुरेश तळवलकर प्रत्येक गाण्यानंतर तालाबद्दल पण बोलणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम खूपच शैक्षणिक झाला आहे.




त्यानंतर आली उर्मिला धनगर, हिने केरवा या तालावर आधारित गाणं सादर केले. "घननिळा लाडीवाळा झुलवू नको हिंदोळा", ताल केरवा, मुळ गायिका माणिक वर्मा, गीत ग.दि. माडगुळकर, संगीत सुधीर फडके. हे गाणं "उमज पडेल तर" या चित्रपटातील आहे. स्वराला स्थिरता नाहीये असे मान्यवर परीक्षकांना वाटले. अतिजास्त हरकती घेतल्या असा एकून सूर होता. दोघांनी "ध" दिला.



मग राहुल सक्सेना आला त्याने अध्ध्या त्रिताल या तालावर आधारित "मी मानपमान", मुळ गायक रामदास कामत, गीत कुसुमाग्रज संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक ययाती आणि देवयानी. ह्याचे उच्चार खूपच हिंदी वाटले. गाणं चांगले म्हटले. याच्याशी पल्लवी आणि मान्यवर परीक्षक हिंदीत बोलत होते. तानबाजी जरा जास्त झाली असा सलीलला वाटले. दोघांनी "ध" दिला.



मृण्मयी तिरोडकरने दादरा तालावर आधारित मालवून टाक दीप हे गाणे म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत सुरेश भट, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. "पेंगते अजून रात" स्वराला चुकले. स्वराला स्थिरता नव्हती या गाण्यात असा मान्यवर परीक्षकांचा शेरा होता. गाणं खूप कठीण आहे असे सलीलचे मत होते, अवधूतला गाणं आवडला नाही. अवधूतने म तर सलीलने ध दिला.




अपूर्वा गज्जलाने केहरवा तालावर "कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" गे गाणं सादर केले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत पी. सावळाराम, संगीत वसंत प्रभू, ताल केहरवा. गाणं खूपच छान झाले. सलीलने व अवधूतने ध दिले.



त्यानंतर आली अभिलाषा चेल्लाम. हिने आज दादरा तालावर "सखी ग मुरली मोहन मोही मना." मुळ गायिका अशा भोसले, गीत पी सावळाराम संगीत पं हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, ताल दादरा. सुरवातीला "पुन्हा" हा शब्द जरा वेगळा म्हणाला. तसेच अंतऱ्यात शृंगाराची हा शब्द पण बेसूर झाला. पण नाहीतर गाणं खूपच चांगले झाले. अवधूतने ध तर सलील ने नी दिला.





Program started with 6 participants today. Because of last week's call back there is not going to be any elimination this week. Today participant are going to sing the song on "Taal". Swarada Gokhale sung "nirgunacha sang dharila jo avadi". Urmila dhangar sung "ghannila ladiwala zulavu nako hindola". Rahul Saxena sung "mi manapman". Mrunmayi Tirodkar sung "malvun taak deep". Apurva Gajjala sung "kalpavruksha kanyesathi lavuniya baba gela". Abhilasha Chellam sung, "sakhi ga murali mohan mohi mana".



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २१ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

आता दुसऱ्या फेरीतील गाणी सुरु झाली. स्वरदा गोखले आली "मम आत्मा गमला " गे गाणं सादर करायला. मुळ गायक बाल गंधर्व, गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत भास्करबुवा बखले, नाटक संगीत स्वयंवर. गाणं चांगले झाले. दोन ध मिळाले.




मग अपूर्वा गज्जलाने "शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला" हे गाणं सादर केले. मुळ गायिका आशा भोसले, गीत शांता शेळके, संगीत हेमंत भोसले. दोन ध मिळाले.





मग आली मृण्मयी तिरोडकर, हिने नाचू किती कंबर लचकली हे गाणं सादर केले. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला आणि अपूर्वा व राहुल होते. मुला गायिका आशा भोसले, गीत जगदीश खेबुडकर, संगीत राम कदम, चित्रपट सुगंधी कट्टा. कोरस खूपच छान झाले. कोरस खूपच छान झाले. दोन ध मिळाले. मृण्मयी जरा दडपणाखाली होती असा वाटत होते.




त्यानंतर अभिलाषा चेल्लामने कशी झोकात चालली कोल्याची पोर हे गाणं म्हटले. कोरस मध्ये उर्मिला, स्वरदा, अपूर्वा आणि मृण्मयी होत्या. मुळ गायिका आशा भोसले, गीत पी. सावळाराम संगीत राम कदम, चित्रपट मोलकरीण. गाणं खूपच सुंदर म्हटले. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.





मग उर्मिला धनगर आली हिने हिच्या नेहमीच्या धाटणीतले गाणे म्हटले. वाडीवरल्या वाटा गेल्या आबालाच्या पारी. मुळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना. धो. महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. अवधूतने गोड शब्दात सांगितले कि त्याच त्याच धाटणीची गाणी न गाता जरा वेगळी गाणी गा. हे अवधूतने सांगितले म्हणजे जरा आश्चर्य आहे. अवधूतने ध तर सलीलने नी दिला.




मग राहुल सक्सेना ने "दाटून कंठ येतो ओठात येई गाणे." मुळ गायक डॉ. वसंतराव देशपांडे, गीत शांता शेळके, संगीत अनिल-अरुण, चित्रपट अष्टविनायक. गाणं खूपच छान म्हटले. आणि या गाण्यात उच्चार देखील चांगले आले. पाडगावकरांची कविता आहे ज्यात ते असे वर्णन करतात कि पाउस कोसळत नाही पण आभाळ भरून येते, तसा मुलीच्या लग्नात बाप दिसतो. तसेच गाणे झाले, असे सलीलने म्हटले. दोन वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून आज राहुल आणि अभिलाषा म्हणण्यात आले. आणि गम्मत अशी आहे कि कार्यक्रम झाल्यावर "आजचा आवाज" मध्ये ज्याचे गाणं दाखवत त्यात. राहुल आणि उर्मिलाला दाखवण्यात आले.







अंतिम फेरीतील शेवटच्या २ उपविजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार, तर १ लाख २५ हजार रुपये, रोख रुपये. सुधीर मांडके डेवलपर्स कडून
क्रोमा कडून विजेत्याला १ लाख ३० हजार रुपयाचे Home Package, २ उपविजेत्यांना चाळीस हजार रुपयांचे home Package. अंतिम फेरीतुन बाहेर पडणाऱ्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी वीस हजारांचे Home Package.
अंतिम फेरीतील विजेत्याला १ लाख रुपयाची Music system, २ उपविजेत्यांना पन्नास हजार रुपयांची Music system. शेवटच्या ४ स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजारांची Music System.


एकूण बेरीज
विजेता १ : १.२५ + १.३ + १ = ३.५५
उपविजेते २ : ०.५ + ०.४ + ०.२ + ०.५ + ०.२५ = १.८५
उरलेले २ : ०.२ + .२५ = ०.४५



In the second round, Swarada Gokhale sung "mam atma gamala ga". Apurva Gajjala sung, "sharad sundar chanderi rati swapnacha zulat zula". After this Mrunmayi Tirodkar sung "nachu kiti nachu kiti, kambar lachakali". Abhilasha Chellam sung, "kashi zokat chalali kolyachi por". Then came Urmila Dhangar who presented "vadivarlya wata gelya abalachya pari". Rahul Saxesa sung "datun kanth yeto othat yei gane" Best performer was given to Abhilasha and Rahul.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १ डिसेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ७ स्पर्धकांना घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आजचे मान्यवर परीक्षक होते "जतीन पंडित".

कार्यक्रमाची सुरवात मृण्मयी तिरोडकरने "ये दिल सून रहा हैं तेरी दिल कि जुबान". मुळ गायिका कविता कृष्णमुर्ती, गीत मजरूह सुलतानपुरी, तर संगीत जतीन-ललित यांचे. चित्रपटाचे नाव आहे "खामोशी द म्युझिकल". गाणं जरा ठीक ठीक झाले. मस्त झाले नाही. सलीलने ध तर अवधूतने प दिला




अपूर्वा गज्जलाच्या हिंदी गाण्याने झाली. "जरा सी आहट होती हैं". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत कैफी आजमी यांचे तर संगीत मदनमोहन यांचे. गाणं हकीकत या चित्रपटातील. जतीन पंडितने या गाण्याची गोष्ट सांगितली. ऐकण्यासारखी आहे. दोन नी मिळाले.




स्वरदा गोखलेने "सुनो सजना पपिहेने" म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि हे आये दिन बहार के या चित्रपटातील गाणं आहे. गाणं ठीक झालं. दोघांनी ध दिले.



जतीनजीने "रुठके हमसे कही जब कही जायोगे तुम" हि ओळ अवधूतच्या आग्रहाखातर म्हटली.




ऋतुजा लाडने "सुनियो जी अरज म्हारी ओ बाबूलाल" म्हटले. मुळ गायिका लता मंगेशकर, गीत गुलजार, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, "लेकीन" या चित्रपटातील गाणं आहे. गाणं म्हणावे तितके रंगले नाही. अवधूतने प तर सलीलने ध दिला.



उर्मिला धनगरने "हवा में उडता जाये मोरा लाल दुपट्टा मलमल का". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत रमेश शास्त्री, संगीत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे "बरसात". हिच्या आवाजात लताची गाणी अगदीच शोभत नाहीत. आणि या गाण्यात उगाचच काही हरकती घेतल्या. अवधूतने म तर सलीलने ध दिला.



अभिलाषा चेल्लामचे "चाहे तुम कुछ ना कहो मैने सून लिया ये साथी प्यार का मैने चून लिया". मुळ गायक साधना सरगम आणि उदित नारायण. गीत मजरूह सुलतानपुरी, संगीत जतीन-ललित यांचे. हे गाणं "जो जिता वो सिकंदर" या चित्रपटातील आहे. गाणं अप्रतिम झाले. त्यानंतर सलील आणि अवधूतने देखील हेच गाणं म्हटले. जतीनजींनी सांगितलेली गोष्ट छान होती. अवधूतने नी तर सलीलने सादिला.




राहुल सक्सेना ने "साजण साजण मै करू, केसरीया बालम", राजस्थानी लोकगीत आहे. गाणं ठीक झाले. मला फार आवडले नाही. सलीलने व अवधूत दोघांनी "नी" दिला.




Today program started with 7 participant. Today's special judge was Jatin Pandit. Program started with Mrunmayi tirodkar's "ye dil sun raha hai teri dil ki juban". Then came Apurva Gajjala who sung "jara see ahat hoti hai". Third performance was by Swarada Gokhale who sing "Suno sajana pahihene". After that Rutuja Laad sung "suniyo ji araj mhari o babulal". Urmila Dhangar sung "Hava me udata jaye mora laal dupatta malmal ka". Abhilasha Chellam sung "Chahe tum kuch na kaho maine sun liye ye sathi pyar ka maine chun liya", Rahul Saxena sung "Sajan sajan mai karu, kesariya balam".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १ डिसेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

स्वरदा गोखलेनी "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती" मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर व संगीत दत्ता डावजेकर. हे गाणं पाठलाग या चित्रपटातील आहे. गाणं ठीक झाले. दोन ध मिळाले.




अपूर्वा गज्जलाने "नभ उतरू आलं चिंब थरथरवल." मुळ गायिका आशा भोसले, गीत ना. धो. महानोर यांचे तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत. गाणं जैत रे जैत या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. पण दोन ध मिळाले.



मृण्मयी तिरोडकरने चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा पेटला त्याला कशी सावरू". मुळ गायिका लता मंगेशकर, गीत वसंत बापट यांचे तर संगीत पं हृदयनाथ मंगेशकरांचे. हे गाणं उंबरठा या चित्रपटातील आहे. गाणं मध्ये मध्ये थोडे कणसूर झाला. दोन ध मिळाले.




ऋतुजा लाड हिने पं. जितेंद्र अभिषेकी यांचे "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, गीत शंकर रामाणी यांचे आहे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे. स्वराभिषेक या अल्बम मधील हे गाणं आहे. दोन ध मिळाले.



राहुल सक्सेना ने "अबीर गुलाल उधळीत रंग." म्हटले. मुळ गायक पं. जितेंद्र अभिषेकी, संत चोखामेळा यांची हि रचना आहे. संगीत राम फाटक यांचे आहे. मध्ये मध्ये सुरात काहीतरी चूक झाली. कानाला बरोबर वाटले नाही. सलीलने प व अवधूतने ध दिला.




अभिलाषा चेल्लाम ने "गुलजार गुलछडी ... बाई माझ्या पायाला बांधला आहे भोवरा". मुळ गायिका आशा भोसले, गीत ग. दि. माडगुळकर. संगीत वसंत देसाई. चित्रपट " धन्य ते संताजी धनाजी" मधील हे गाणं आहे. गाणं मस्तच झाले. दोन सा मिळाले.





उर्मिला धनगरने "राया अशी जवळ मला घ्याल का? " मुळ गायिका क्षमा बाजीकर, गीत शांता शेळके संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे. हे गाणं हे बंध रेशमांचे मधील आहे. परत उर्मिलाने तिला जमेल अश्या पठडीतले गाणं म्हटले. त्यामुळे गाणं उत्तमच झाले. दोन्ही वरचे सा मिळाले.




बेस्ट पेर्फोर्मेर म्हणून अभिलाषा चेल्लाम चे नाव घोषित झाले.




After Hindi round, Marathi round started, Swarada Gokhale sung ya dolyanchi don pakhare phiratil tumachya bhovati". Apurva Gajjala sung "Nabh utari aala chimb tharatharaval", Mrunmayi Tirodkar sung "chand matala matala". rutuja laad sung "randhrat perili mi ashadh dard gani". Rahul Saxena performed "abeer laal udhalit rang", Abhilasha Chellam sung "guljar gulchhadi, bai mazya payala bandhalay bhovara". Urmila Dhangar sung "raya ashi javal mala ghyal ka ?". Best performer of the day was "Abhilasha Chellam"

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज एकूण ८ स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक स्पर्धेबाहेर जाणार. या आठवड्यात जो निकाल लागणार आहे त्या मार्कांची विभागणी ३०% SMS व ७०% परीक्षकांची मते अशी आहे. पहिल्या क्रमांकावर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात जास्त मार्क परीक्षकांनी दिले. याने "आम्ही ठाकर ठाकर" सदर केले. मूळ गायक रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, गीत ना धो महानोर, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जैत रे जैत. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, स्वरदा आणि उर्मिला होत्या. कोरस मस्त होते. सलीलच्या comments मस्त होत्या.




दुसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. हिने "कृष्णा मजकडे पाहू नको, माझी घागर गेली फुटून" मूळ गायक आणि संगीत यज्ञेश्वर लिंबेकर, रचना माणिक प्रभू, अल्बम भक्तीचा मळा. गुण आणि मत दोन्ही प्रमाणे हि दुसर्या क्रमांकावर होती. गाणं ठीक झाले. पण नेहमीप्रमाणे परीक्षकांना खूप आवडले. सलील बेस्ट या मधील comments अगदी विनोदी.




तिसर्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर. "झिनी झिनी वाजे बीन". मुळ गायिका आशा भोसले. गीत बा. भ. बोरकर आणि संगीत श्रीधर फडकेचे. ऋतू हिरवा या अल्बम मधील हे गाणं आहे. गाण्यात खूप मजा आली नाही. प्रसन्न वाटले नाही. सलीलने खूप छान बा. भ. बोरकरांच्या ४ ओळी सांगितल्या.

स्वर्ग नको सूरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
मुक्ती नको मज तृप्ती नको मज येथील हर्ष नी शोक हवा

गाणं खूप गंभीर वाटले, असे सलीलला वाटले आणि अवधूतच्या मते गाणं सुराला जरा कमी झालं.


चौथ्या क्रमांकार होती अपूर्वा गज्जला. हिला मत कमी होती पण गुणांच्या जोरावर हे पुढे आली. "या पंढरीचे सुख पाहता डोळा तुझा तो जिव्हाळा योगीयांचा". मूळ गायिका आणि संगीत किशोरी अमोणकर, रचना संत एकनाथ, अल्बम रंगी रंगला श्रीरंग. गाणं खूपच सुंदर झाले. अपूर्वा खूप छान गाणं म्हणायला लागली आहे.



Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

पाचव्या नंबर होती स्वरदा गोखले. हिला सगळ्यात जास्त मत मिळाली आहेत. "मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा" मुळ गायिका कृष्ण कल्ले, गीत ना. घ. देशपांडे, संगीत यशवंत देव. अवधूतवर स्वरदाने फेकलेला गुगली जोरदार होता. गाणं मस्त झाले. सलीलने जरा excitement कमी करून गा असा सल्ला दिला.



आता Danger Xone सुरु झाला. अभिलाषा चेल्लम, ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे या तिघी होत्या. त्यात प्रथम आली अभिलाषा चेल्लम. हिला खूपच कमी गुण मिळाले होते, पण SMS भरपूर आले आहेत. "जंतर मंतर रातीला चंद्राची पिंडली चोरून नेली" हे बेला शेंडे ने म्हटलेले गाणं सादर केले. गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी ह्याचे तर हृदयातील गाणं या अल्बम मधील हे गाणं आहे. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला, मृण्मयी आणि अपूर्वा होत्या. गाणं मस्त झाले. हि गाणं छानच म्हणते. पण हिला Danger Zone चा खूप ताण आला आहे असे वाटत होते.




त्यानंतर आली ऋतुजा लाड "कुण्या गावाचे आलं पाखरू". चित्रपट "सुशीला" मधील हे गाणं, गायलंय "उषा मंगेशकर" ह्यांनी, गीत आहे, जगदीश खेबुडकरांचे तर संगीत आहे राम कदम यांचे. हिला शेवटून दुसर्या नंबर वर मार्क मिळाले होते. कोरसमध्ये मृण्मयी आणि अभिलाषा होत्या. गाणं चांगले झाले. अवधूतच्या comments जोरदार होत्या.



सगळ्यात शेवटी आली अश्विनी देशपांडे. "ऋतुराज आज वनी आला". मुग्धा वैशंपायनची नक्कीच आठवण झाली. अश्विनीचे गाणं परत नाकातून वाटले. मुळ गायिका मधुवंती दांडेकर, गीत विध्याधर गोखले, संगीत प्रभाकर भालेकर, नाटक मदनाची मंजिरी. हे गाणं मस्त म्हटले. हे हिचे ह्या स्पर्धेतील शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहित नसून देखील मस्त म्हटले. सलीलचे सैपाकघरातील कॉम्मेंत्स मस्त होत्या.




आता निकाल. आजच्या स्पर्धेत आज बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळाली.




मार्क या प्रमाणे
अश्विनी देशपांडे - परीक्षक ७३.५ % SMS - ९.०२%
ऋतुजा लाड - परीक्षक ८०.0 % SMS - ५.२४ %
अभिलाषा चेल्लाम - परीक्षक ७७.५% SMS - ११.८५%
स्वरदा गोखले - परीक्षक ८१% SMS - २१.७५ %
अपूर्वा गज्जला - परीक्षक ८८.५ % SMS - ५.५९%
मृण्मयी तिरोडकर - परीक्षक ८७.५ % SMS - १६.५२%
उर्मिला धनगर - परीक्षक ९५% SMS - १९.७६ %
राहुल सक्सेना - परीक्षक १०० % SMS - १०.२७ %


Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Ashwini Deshpande : Marks 73.5% SMS - 9.02%
Rutuja Laad : Marks 80.0% SMS - 5.24 %
Abhilasha Chellam : Marks 77.5% SMS - 11.85 %
Swarada gokhale : Marks 81.0% SMS - 21.75 %
Apurva Gajjala : Marks 88.5% SMS - 5.59 %
Mrunmayi Tirodkar : Marks 87.5% SMS - 16.52 %
Urmila Dhangar : Marks 95.0% SMS - 19.76 %
Rahul Saxena :Marks 100.0% SMS - 10.27 %

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २४ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

उर्मिला धनगरने म्हटले "मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे". मूळ गायक सोनू निगम, मनमोहन सिंग, गीत समीर यांचे, तर संगीत ए. आर. रहमान यांचे. हे गाणं The Legend of Bhagat Sing या चित्रपटातील आहे. गाणं अप्रतिम झाले. अगदी मनापासून म्हटले.





सलील कुलकर्णीने आज "दमलेल्या बापाची या कहाणी तुला" हे गाणं म्हटले.




मृण्मयी तिरोडकरने "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी". मुळ गायिका आशा भोसले. गीत ग. दि. माडगुळकर यांचे तर संगीत दत्ता डावजेकर यांचे. "पाहू रे किती वाट" या सिनेमातील हे गाणं आहे. गाणं चांगले झाले.





शेवटचे गाणं म्हणायला आली अभिलाषा चेल्लाम. "वंदे मातरम" , मूळ गायिका लता मंघेष्कर, गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय, संगीत हेमंत यांचे , चित्रपट आनंद मठ. कोरसमध्ये होत्या स्वरदा, मृण्मयी, ऋतुजा आणि अपूर्वा





कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मान्यवर पोलिसांना स्टेजवर बोलावून झाली.

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २४ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ८ स्पर्धक घेउन कार्यक्रम सुरु झाला. मागील वर्षी झालेल्या हल्ल्याच्या स्मृती प्रीत्यर्थ हा कार्यक्रम पोलिसांना समर्पित केला होता. कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या "जयोस्तुते श्री महन्मंगले" या गाण्याने झाली. मूळ गाणं लता मंगेशकरने म्हटलेले आहे. गीत स्वातंत्रवीर सावरकरांचे आहे तर संगीत मधुकर गोळवलकरांचे आहे. कोरस मध्ये स्वरदा, मृण्मयी, अश्विनी आणि उर्मिला होत्या. गाणं मस्तच झाले. आज मार्क दिसणार नाहीत.

सलील म्हटलेल्या काही ओळी.

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मुठ पोलादी जयांची हि धरा दासी तयांची
पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
हे श्वास येथे घ्यावयाचा.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे. "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधिला पेटली न वात" मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज संगीत वसंत प्रभू. गाणं चांगले झाले. पण खूप मनाला भावले नाही. आर्या आम्बेकारची आठवण आली. सलील ने कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली.

महापुरुष मरतात तेव्हा जागे होतात जागोजागचे संगमरवरी दगड
आणि पुन्हा एकदा त्यांचे आत्मे चिणून मारतात त्यांना दुसऱ्यांदा बहुदा कायमचेच
म्हणून महापुरुष दोनदा मरतात एकदा वैर्यांकडून आणि एकदा भक्तांकडून
असे संगमरवरी मरण तुला न लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना



त्यानंतर आली स्वरदा गोखले "ए मेरे वतन के लोगो". मूळ गाणं लता मंगेशकरचे, गीत कवी प्रदीप, तर संगीत सी. रामचंद्र. ह्या गाण्यात सुरवातीला लाडिक भाव जास्त आले, दुखद येण्याऐवजी असे मला वाटले. पण नंतर चांगले झाले. कोरस मध्ये मृण्मयी, अभिलाषा, ऋतुजा आणि अपूर्वा होत्या.




राहुल सक्सेनाचे "जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो" गाणं झाले. मूळ गाणं गायलंय सोनू निगम, रुपकुमार राठोड यांनी, गीत आहे इसरार अन्सारी यांचे, तर संगीत आहे जतीन ललित यांचे. हे गाणं सरफरोश या चित्रपटातील आहे. कोरस मध्ये स्वरदा, ऋतुजा, अभिलाषा मृण्मयी व अमर ओक होते. गाणं खूपच सुंदर झाले. अगदी मनापासून होते.






अपूर्वा गज्जला हिने "सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव शिरी", मूळ गायिका लता मंगेशकर, गीत कुसुमाग्रज, संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर. अमर ओकची बासरी उत्कृष्ट. हिचे गाणे खूपच छान झाले. आता पर्यंत हिने जी गाणी म्हटली त्यातील हेसगळ्यात उत्कृष्ट गाणं होत.




Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धक घेऊन कार्यक्रम सुरु झाला. आज एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. आज दाखवणारे मार्क ८०% परीक्षक तर २० टक्के SMS आहे. सलीलने खूपच छान ४ ओळी सांगितल्या.
तसे नसते कोणीच आपले कसले मित्र कसली साथ
फक्त बारा सखे तुझे पाच काळे पंढरी सात.
कार्यक्रमाची सुरवात ऋतुजा लाडच्या गाण्याने झाली. प्रथम क्रमांकावर होती ऋतुजा लाड. "चंद्रिका हि जणू" ह्या गाण्याचे सादरीकरण केले. मूळ गायक पं हृदयनाथ मंगेशकर. गीत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत गोविंदराव टेंबे. संगीत मानापमान या नाटकातील हे पद आहे. आजपासून SMS ला ३०% महत्व असणार आहे.




दुसऱ्या नंबर होती मृण्मयी तिरोडकर. "हि सांज सुखाने सजलेली, अन दरवळणारा श्वास तुझा". मूळ गायिका वैशाली सामंत. गीत चंद्रशेखर सानेकर, संगीत अवधूत गुप्ते, अल्बम "हि सांज सुखाने". गाणं छान झाले. अवधूत आणि सलीलच्या आपापसातील गप्पा मजेशीर होत्या.




तिसऱ्या क्रमांकावर होती उर्मिला धनगर. "झाल्या तिन्ही सांजा, करुनी शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा" हे गाणं सदर केले. मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शाहीर दादा कोंडके, संगीत राम-लक्ष्मण. हे गाणं तुमचे आमचे जमलं या चित्रपटातील आहे.



चौथ्या क्रमांकावर होती अभिलाषा चेल्लम. "पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे" मूळ गायिका आशा भोसले, गीत गंगाधर महाम्बरे यांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचे. खूपच सुंदर म्हटले. हिचे उच्चार खूपच छान आहेत. अवधूतच्या मते अंतरात लय नीट जमली नाही





पाचव्या नंबर वर होता राहुल सक्सेना. याला सगळ्यात कमी SMS आले असे म्हणणे होते. "राधा हि बावरी". याचे उच्चार नीट आले नाहीत. विशेषता रंग, शामरंग, वाट, हे नीट जमले नाहीत. मूळ गायक स्वप्नील बांदोडकर, संगीत आणि गीत अशोक पत्की, यांचे. हे गाणं तू माझा किनारा या अल्बम मधील आहे. हा नको तिथे हरकती घेतो.





सहाव्या क्रमांकावर होती अश्विनी देशपांडे. "पाखरा जा दूर देशी". मूळ गायिका सुमन कल्याणपूर, गीत अशोकजी परांजपे यांचे आणि संगीत अशोक पत्की यांचे. सलीलच्या मते गाणं दडपण ठेवून म्हटले. अवधूतच्या मते पण जरा पाखरांचा balance जरा हलत होता.



Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - २३ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

मग Danger zone मधील तिघींची गाणी झाली. संहिता प्रथम आली, "ये रे घना" SMS मध्ये चौथ्या क्रमांकावर होती असे म्हणणे होते. मूळ गायिका आशा भोसले, गीत आरती प्रभू यांचे आणि पं हृदयनाथ मंगेशकर यांचे. हिचे पं गाणं मध्ये मध्ये श्वासाला जरा चुकत होते. "टाकुनिया घरदार" जरा बेसूर झाले. गाणं जरा दडपणाखाली झाले असे वाटत होते. आज आपण जाणार या कार्यक्रमातून अस हिला वाटत होते कि काय असे वाटत होते.




त्यानंतर आली स्वरदा गोखले. "काय बाई सांगू कशी ग सांगू" मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत शांत शेळके यांचे आणि संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे. हे गाणं पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातील आहे. गाणं ठीक झाले. खूप मस्त झाले अस वाटले नाही. गाणं लाडिक झाले तसेही हिचे गाणं तसच असते नेहमी.





अवधूतने काय बाई सांगू चे remix म्हटले.




त्यानंतर आली अपूर्वा गज्जला. "केळीचे सुकले बाग". मूळ गायिका उषा मंगेशकर, गीत कवी अनिल यांचे आणि संगीत यशवंत देव यांचे. गाणं खूपच सुंदर झाले. वरचा सूर नीट लागला नाही असे अवधूतला वाटले. सलीलच्या मते अपुर्वाचा आवाज खूप सुंदर आहे.




आता निकाल, अपूर्वा, संहिता आणि स्वरदा Danger Zone मध्ये होत्या. सलील पण देवाची प्रार्थना करत होता. संहिताच्या अंगावर जेव्हा लाल दिवा पडला तेव्हा अपूर्वा तो दिवा आपल्या अंगावर पडतो कि काय असे बघत होती. इकडे मृण्मयी रडत होती. पण संहिता अगदी मजेत होती.

मार्क या प्रमाणे
संहिता चांदोरकर, परीक्षक ७१.६७%, SMS ११.६५
अपूर्वा गज्जला, परीक्षक ७५%, SMS ५.४७%
स्वरदा गोखले, परीक्षक ७२.३३%, SMS २०.११%
अश्विनी देशपांडे, परीक्षक ७७.३३%, SMS ५.१८%
राहुल सक्सेना, परीक्षक ७७.६७%, SMS ४.९०%
अभिलाषा चेल्लाम, परीक्षक ७८%, SMS ५.९५%
उर्मिला धनगर, परीक्षक ७८.६७ %, SMS २१.०६%
मृण्मयी तिरोडकर, परीक्षक ८१.६७%, SMS १९.०६%
ऋतुजा लाड, परीक्षक ९३.३३%, SMS ६.६१%

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग 1 (SRGMP MARATHI SEASON 7)

आज ९ स्पर्धकांना घेऊन स्पर्धा सुरु झाली काल सुस्मिरता बाहेर पडली. आजचे मान्यवर परीक्षक शुभा मुदगल आज पल्लवीचा ड्रेस खूप छान होता आणि मुख्य म्हणजे ड्रेस वरची ओढणी ड्रेसला सूट होत होती. आता या आठवड्यात ८०% परीक्षकांचे मार्क आणि २०% SMS असे गणित असणार आहे. मान्यवर परीक्षकांचे मार्क दिसणार नाहीत, (याचा अर्थ ते मार्क नंतर manipulation साठी वापरता येतील )

आजचा कार्यक्रम समूह गीताने झाला. "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". शेजारी या सिनेमातील हे गाणं आहे.





अपूर्वाच्या गाण्याने स्पर्धेला सुरवात झाली "ना मानोगो तो दुंगी तुम्हे गारी रे". आज सगळे स्पर्धक गाण्यावर आधारित गाणी म्हणणार आहात. त्याप्रमाणे हे गाणं "मालकंस" या रागातील होते. गाणं जास्त भावपूर्ण हवे होते. श्वास पुरत नव्हता असे अवधूतचे मत होते. अवधूतने "ध" तर सलीलने "प" दिला.




दुसरे गाणं मृण्मयी तीरोडकरचे "घनु वाजे घुणघुण वारा वाहे रुणझुण". राग बागेश्री मधील हे गाणं आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत, आणि लता मंगेशकरच्या आवाजात हेमुळ गाणं आहे. गाण्याची सुरवात म्हणावी तितकी छान झाली नाही. सुरवातीचा आलाप अगदीच जमला नाही. दोन ध मिळाले.




त्यानंतर आली स्वरदा गोखले "येणार नाथ आता". राग धानी वर आधारित असलेले हे गाणं सुवासिनी या चित्रपटात आशा भोसलेच्या आवाजात, संगीत सुधीर फडकेचे आणि गीत ग दि माडगुळकरांचे आहे. गाणं चांगले झाले. पण खालचे स्वर तितकेसे छान लागले नाहीत असे शुभा मुदगलचे मत होते. दोन प मिळाले.




नंतर आली रुतुजा लाड "घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद". राग सालगवराळी वर आधारित हे गाणं पं. जितेंद्र अभिषेकी यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात गायलेले आहे. याचे बोल पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे तर संगीत जितेंद्र अभिषेकीचेच आहे. गाणं खूपच मस्त झाले. हि सगळीच गाणी मस्त म्हणते. हिचा आवाज अगदी मधुर नाही पण खूप सुरेल आहे. दोन नी मिळाले.





त्यानंतर आली संहिता चांदोरकर "प्रभुजी गमला मनी तोषला." भैरवी मधील हे गाणं बालगंधर्वांनी गायलेले आहे. गीत विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे तर संगीत गंधर्व नाटक मंडळी यांचे. हे गाणं एकाच प्याला या नाटकातले आहे. जरा शांत होऊन गाणं म्हणायला हवे होते असे सलीलचे मत होते. घाईघाईत म्हटले असे शुभा मुदगलने म्हटले. अवधूतने ध व सलीलने "प" दिला.





Today all the participant will sing "raag" based songs. The program starts with the group song, "lakh lakh tejachi nyari duniya". First song in the competition is by Apurva Gajjalla "na manogo to dungi tumhi gaari re". Song is based on Malkans. Second song is by Mrunmayi Tirodkar "ghanu waje ghunghun vara vahe runzun". Based on raag "bageshri". This song is by Sant Dnyaneshwar, composed by Hrudayanath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar. Third song was by Swarada Gokhale "yenar naath ata". Based on raag dhani, sung by Asha Bhosale, composed by Sudhir Phadake and written by G. D. Madgulkar. This song is from movie "suwasini". Forth song was by Rutuja Laad, "ghei chaand makarand, priya ha milind", composed by Jitendra Abhisheki, written by Purushottam Darvhekar, sung by Jitendra Abhisheki. This song is from "katyar kalajat ghusali". Then comes Sanhita Chandorkar "Prabhuji gamala mani toshala". Original singer Balgandharva, written by Viththal Sitaram Gurjar, and composed by Gandharva natak mandali. Song is from Ekach Pyala.


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १७ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


उर्मिला धनगरचे "रे नंदलाला तू छेडू नको ". राग मिश्र किरवाणी मधील हे गाणं शोभा गुर्टू यांनी गायले आहे. गीत उमाकांत काणेकर तर संगीत श्रीकांत ठाकरे यांचे आहे. अधीर याद तुझी या अल्बम मधील हे गाणंआहे. गाणं चांगले झाले पण आजचे गाणं इतके छान झाला नाही म्हणजे बेसूर वगैरे कुठेच झाले नाही पण मजा आली नाही. सूर लावताना आवाजात कंप होता असे मान्यवर परीक्षकांचे मत होते. अवधूतने आणि सलीलने ध इतके कमी मार्क कधीच उर्मिलाला मिळाले नव्हते.



उर्मिला नंतर आला राहुल सक्सेना "प्रथम तुज पाहता जीव वेडावला". मुंबईचा जावई या चित्रपटातील, राग कलावती वर आधारित, हे गाणं रामदास कामत यांनी गायले आहे. ग. दि. माडगुळकरांचे गीत असून संगीत सुधीर फडकेंचे आहे. स्पर्श या शब्दामध्ये हिंदीची झाक येत होती सगळ्या ताना एकदम स्वच्छ आल्या काही ठिकाणी बेसूर झाले असे सलीलचे मत होते शुभा मुदगलच्या मते जरा संयमाने गायला हवे कारण उगाच आलाप आणि ताना घेण्याची गरज नाही आहे दोन ध मिळाले.





त्यानंतर आली अश्विनी देशपांडे " विकल मन आज झुरत असहाय". राग सरस्वती वर आधारित हे गाणं बकुल पंडित यांनी गायले आहे. गीत शांता शेळके यांचे तर संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आहे. हे गाणं "हे बंध रेशमांचे" या नाटकातील आहे हि शास्त्रीय गाणं जास्त चांगले म्हणते हे परत या गाण्यावरून सिद्ध झाले पण हिचा आवाज नाकातून येतो बरेचदा असे मला जाणवते . गाणं छान झाले असे अवधूत म्हणाला श्वासावर नियंत्रण हवे . हे गाणं राग सरस्वती मधील आहे असे शुभा मुदगल म्हणाली सलीलचे उदाहरण मस्त होते . दोन्ही ध मिळाले .





शेवटचे गाणं सदर करायला आली अभिलाषा चेल्लम ऋतू हिरवा ऋतू बरवा ". राग चारुकेशी वर आधारित हे गाणं आशा भोसले यांनी गायले आहे. संगीत श्रीधर फडके यांचे तर गीत शांता शेळके यांचे आहे. हे गाणं ऋतू हिरवा या अल्बम मधील आहे. गाणं मस्तच झाले हिच्या कुठल्याच उच्चारात हिंदी किंवा तमिळची झाक येत नाही कोरस मध्ये अपूर्वागज्जला ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे होत्या कोरस मस्त झाले गाणं सोडताना जरा नित आले नाही असे अवधूत म्हणत होता आवाज खूप छान आहे असा शुभा मुदगलचा शेरा होता सलीलचे उदाहरण मस्त होते परत दोन ध मिळाले.




आजचा best performer म्हणून ऋतुजा लाड होती.




कार्यक्रमाची सांगता शुभा मुदगलच्या गाण्याने झाली. "तेरे बाके नैनो ने जादू डाला सावरिया."






Urmila Dhangar sings "re nandalala tu chhedu nako". Song based on Mishra Kirwani. Original singer Shobha Gurtu, written by Umakant Kanekar and composed by Shrikant Thakare, is from "adheer yaad tuzi". After this Rahul Saxena performs "pratham tuj pahata". Song is from Mumbaicha Javai, sung by Ramdas Kamat, written by G.D.Madgulkar and composed by Sudheer Phadake. Ashwini Deshpande sung "vikal man aaj zurat asahay", based on raag Sarswati, written by Shanta Shelke, composed by Jitendra Abhisheki, is from "he bandh reshamanche". Last song was by Abhilasha Chellam, "rutu hirva rutu barva". Original singer is Asha Bhosale, composed by Shreedhar Phadake, written by Shanta Shelke and is from album "Rutu Hirva". Todays best performer was "Rutuja Laad". Program ended by Shubha Mudgal's song "Tere baake nainone jadu daala savariya".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज अंतिम फेरीचा पहिला निकाल आहे. आज १० स्पर्धक आहेत. आज Danger Zone सुरु झाला आहे. सगळ्यात जास्त मार्क ज्याला मिळाले ती स्पर्धक आज प्रथम गाणं म्हणणार आहे. सगळ्यात जास्त मार्क अभिलाषा चेल्लाम. "कुठं तुम्ही गेला व्हता सांगा कारभारी" कोरस मस्त झाले. तसेच अभिलाशाचे गाणं देखील मस्त झाले.




दुसऱ्या स्थानावर आहे उर्मिला धनगर. "नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला शाम". हे गाणं जरी उर्मिलाच्या आवाजाला शोभत नसले तरी तिने गाणं खूपच छान म्हटले.




तिसऱ्या क्रमांकावर आला राहुल सक्सेना. "नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो.". पल्लवी फक्त राहुल बरोबरच हिंदीत का बोलते हे एक कोडेच आहे. कारण अभिलाषा आणि अपूर्वा देखील अमराठी आहेत, पण त्यांच्याशी ती मराठीतच बोलते. या गाण्यात इतके छान भाव आले नाहीत. पण प्रयत्न चांगला होता. या गाण्यात राहुल अमराठी आहे असे जाणवत होते. कारण बरेच शब्द तो अगदी प्रयत्नपूर्वक उच्चारतो आहे असे वाटत होते.



सलीलने पण हे गाणं म्हटले.



चौथ्या क्रमांकावर होती मृण्मयी तिरोडकर "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फूलावीत." लय जरा कमी पडत होती असे अवधूतला वाटले.






पाचव्या क्रमांकावर होती "स्वरदा गोखले". "लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू ". गाणं चांगले झाले. खालचे स्वर स्थिर नव्हते असे मला वाटले.




This week the results for the final round will be announced. Today the order of singers is decided as per the marks plus votes they received last week. As per that, the first participant was Abhilasha Chellam. She sings "Kutha tumhi gela vhata sanga karbhari". Second highest was Urmila Dhangar, performs "Bai mi vikat ghetala sham". Third song was by Rahul Saxena "Nasates ghari tu jevha". Forth in order was Mrunmayi Tirodkar "Malachya malyamandi patache pani jaata". Fifth in the position was Swarada Gokhale "Limblon utaru kashi, asashi dur laamb tu".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १६ नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

सहाव्या क्रमांकावर होती ऋतुजा लाड "पैल तो गे काऊ कोकताहे". अवधूतच्या मते professionaly गायला हवे. गाणं मस्तच झाले.




सातव्या क्रमांकावर होती "अपूर्वा गज्जल्ला". "सावलीस का कळे उन्हामधील यातना. " गाणं खूपच चांगले म्हटले आणि भूमिकेत शिरून म्हटले.




Danger Zone मध्ये असलेल्या स्पर्धकांना प्रोहत्सान म्हणून मनाली कुलकर्णी काही वाक्य बोलली.




आता शेवटचे ३ स्पर्धक, सगळ्यात प्रथम आली अश्विनी देशपांडे. "मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना" कलाकाराने कसे असायला हवे हे सांगितले. अवधूतचे नेहमीप्रमाणेच भन्नाट comments होते. "जाता जाता गाईन मी, गाता गाता गाईन मी, गेल्यावरही या गगनातील या गीतांमधुनी राहीन मी."





नवव्या क्रमांकावर होती सुस्मिरता डवाळकर "सख्या चला बागामंदी रंग खेळू चला." कोरस मध्ये अश्विनी, ऋतुजा, उर्मिला आणि मृण्मयी होत्या. हिला सगळ्या जास्त SMS मिळाले. गाणं चांगले झाले. शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहिती नसून देखील, tention न येऊ देता गायला.




त्यानंतर आली संहिता चांदोरकर, "येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अश्या क्षणांना". गाणं चांगले झाले.




आता निकाल. आजच्या निकालाप्रमाणे सुस्मिरता बाहेर पडली.




Sixth song was by rutuja Laad "Pail to he kau kokatahe", Seventh was Apurva Gajjala "Savalis ka kale unhamadhil yatana". Now Danger zone starts. Out of these 3 one will go out. First comes Ashwini Deshpande "Mala mhanatat ho mhanatat punyachi maina". Then Susmirata Dawalkar sings "Sakhya chala bagamandi rang khelu chala". Last song in todays's competition is sung by Sanhita Chandorkar "Yeu kashi priya, save tuzya ashya kshananna". After all the songs results were announced and Susmirata Dawalkar went out of the competition.


Susmirata - Marks 72.83% - SMS 56.34
Sanhita - Marks 81.67% - SMS 4.74
Ashwini - Marks 80% - SMS 1.93
Apurva - Marks 83.33 - SMS 3.45
Rutuja - Marks 83.33 - SMS 4.06
Swarada - Marks 85.00 - SMS 2.94
Mrunmayi - Marks 85.00 - SMS 8.43
Rahul - Marks 87.17 - SMS 3.52
Urmila - Marks 90% - SMS 11.64
Abhilasha - Marks 95% - SMS 2.96

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १० नोव्हेंबर २००९. भाग १ (SRGMP MARATHI SEASON 7)

आज दूसरा दिवस आणि आज कोणीही बाहेर पडणार नाही. आजचे परीक्षक आहेत रवींद्र साठे. पहिले स्पर्धक होती मृण्मयी तिरोडकर "कहना हि क्या". कोरस मध्ये शेवटी काहीतरी तालाची गडबड झाली. मृण्मयीच्या स्वरात कंप जाणवला. आज रवींद्र साठेचे मार्क दिसणार नाहीत. अवधूत आणि सलील कडून "नी" मिळाला.




दुसरे गाणं म्हणायला आली स्वरदा गोखले, "जिया ले गयो जी मोर सावरिया". सुरवातीचे स्वर अगदीच बेसूर झाले. पण तिच्या लक्षात आले. गाणं बेसूर झाले बरेच. "बासुरीया " म्हणताना बेसूर जाणवत होतेच. "ध" मिळाला. पण ध च्या लायकीचे गाणं निश्चित झाले नाही.




तिसरे गाणं म्हणायला आली ऋतुजा लाड "हिरे मोती मै न चाहू". गाणं इतके छान झाले नाही. म्हणजे काय चुकलं ते सांगता येत नाही पण गाणं मनाला भावले नाही. गाणं छान झाले असे परीक्षक म्हणाले, मार्क "ध" आणि "नी" मिळाला.




चौथे गाणं म्हणायला आली संहिता चांदोरकर "जबान पे लगा लगा". गाणं चांगले झाले. सलीलच्या मते जरा हाताचे राखून गायलीस. त्यामुळे बहुतेक त्याने पण हाताचे राखून मार्क दिले. "नी" व "ध" मिळाला.





पाचव्या गाण्यापासून मराठी गाण्याची सुरवात झाली. सुस्मिरता डवालकर आली "कौसल्येचा राम बाई". हे गाणं एकदमच संथ आहे. त्यामुळे संहिताच्या गाण्यानंतर एकदम मिळमिळीत वाटले. "राम" नीट ऐकू आला नाही तो जरा स्पष्ट म्हणावा असा एक सल्ला होता. दोन्ही "ध" मिळाले.




मग आली अपूर्व गज्जला, "तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल". गाणं चांगले म्हटले. गाणं सुरवातीला जरा बेसूर झाले. पण नंतर गाणं चांगले झाले. दोन्ही "ध" मिळाले.





त्यानंतर राहुल सक्सेना आला "काळ देहासी आला खाऊ". गाणं चांगला झाले. पण अति जास्त नको तिथे ताना घेतल्या. आणि काही ठिकाणी थोडे बेसूर पण झाले. मराठीतील उच्चार आले नाहीत. दोन "ध" मिळाले.







Today is the second day of the first final week. Today no one will be out of competition. Only the best performer will be announced. Today's special judge is Ravindra Sathe. First song was by Mrunmayi Tirodkar "kahana hi kya jo nain ek anjan se mile". Second song was by Swarada Gokhale "jiya lo gayo ji mora savariya". Third song was by Rutuja Laad "hire moti mai na chahu". Forth song was by Sanhita Chandorkar "jaban pe laga laga". From fifth song Marathi songs started. This was done by Susmirata Davalkar "kauselyecha raam bai ". Sixth song was by Apurva Gajjala "tumhavar keli mi marji bahal" Seventh song was by Rahul Saxena "kaal dehasi aala khau".


Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


रवींद्र साठेचे "अजब सोहळा"





सलीलच्या आग्रहावरून "पीकं करपल पक्षी दूरदेशी गेलं" रवींद्र साठेच्या आवाजात. या गाण्यासाठी रवींद्र साठेंना राज्य पुरस्कार मिळाला होता. यात खूप छान आठवणी आहेत. सलील, अवधूत आणि रवींद्र साठे आठवणी सांगत आहेत.




अश्विनी देशपांडेचे "मजवरी तयांचे प्रेम खरे, जे पहिले जडले ते उरे." नाकातून आवाज आज जरा कमी आला. सगळ्या ताना खूपच स्वच्छ घेतल्या. प आणि ध मिळाले. गाणं प आणि ध च्या लायकीचे नव्हते तर दोन्ही ध च्या लायकीचे होते.





मग आली अभिलाषा चेल्लाम, "घनरानी साजणा". "सुखद मधुर वाटतात हवे, यौवना" यानंतरचा आलाप अगदीच चुकला. पण नाहीतर गाणं कुठे चूक काढावी असे नव्हते. गाणं म्हटलेले अभिलाशाचेच वाटते असे सलीलचे मत होते. आवाज खूप उत्तम आहे असे रवींद्र साठेचे मत होते. "ध" व "नी" milale




उर्मिला धनगरचे "पानापानात दिसतो कान्हा". हि बरोबर हिच्या आवाजाला शोभतील अशीच गाणी निवडते. आणि चांगली म्हणते. कारण हिच्या आवाज बराच जाड आहे, मधुर आहे असे म्हणता येणार नाही. गाणं मस्त झाले. दोन्ही "सा" मिळाले.





आजचा सर्वोत्कृष्ट स्पर्धक होता "उर्मिला धनगर".




कार्यक्रमाची सांगता रवींद्र साठेच्या गाण्याने झाली "वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद"






Ravindra Sathe sung 2 songs. They are "must watch". Seventh participant was Ashwini Deshpande "Majvari tayanche prem khare je pahile jadile te ure". Abhilasha chellam sung "Ghanrani sajana". Urmila dhangar sung "Panapanat disato kanha". This week's best performer was "Urmila Dhangar". Program ended by Ravindra Sathe's song "Valan vatatalya zadit hirave chand".