Showing posts with label Mona Kamat. Show all posts
Showing posts with label Mona Kamat. Show all posts

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

आज दुसर्या राउंड नंतर होण्याऱ्या Knock Out Round चा आज दुसरा दिवस. आज पुन्हा ६ उभरते गायक. काल ३ स्पर्धक उपांत्य फेरीत गेले. आता आज बघायचे किती पुढे जातात. आजचे मान्यवर परीक्षक होते सुरेश वाडकर. आजच्या कार्यक्रमाची सुरवात "कोटी कोटी रुपु तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. " या सुरेश वाडकरांच्या गाण्याने झाली.



स्पर्धेची सुरवात मोना कामतच्या गाण्याने झाली. "प्रभाती सूर नभी रंगती" हे गाणं तिने चांगले म्हटले. गाणं खूप सुरात झाले नाही असे सलीलचे मत होते आणि सुरेश वाडकर म्हणाले कि गाणं भिजलेले हवे, फक्त सुरात म्हणत होती गाण्यात ओलावा नव्हता. अवधूतचे पण मत असेच काहीसे होते. आज मार्क मिळणार नव्हते तर शेवटी एकदम निकाल.



दुसरे गाणं म्हणायला मंचावर आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. याने "संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतं". मध्ये मध्ये बेसूर झाला. मधला एक आलाप जमला नाही. सगळ्याच्या मते गाणं चांगले म्हटले पण सुरांकडे थोडे लक्ष द्यायला हवे असे मत होते.




तिसरं गाणं स्वप्नील चाफेकरचे "माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद" झाले. श्रीधर फडकेचे संगीत असलेली हि रचना अत्युत्तम आहे. सुरेश वाडकरांच्या मते सुराला खूप धरून नव्हते. सलीलचे असे मत होते कि रसनिष्पत्ती नीट झाली नाही. अवधूतने पण तेच सांगितले.



चौथे गाणे मृण्मयी तिरोडकरचे "वाट पाहुनी जीव शिणला दीसामागून दिस टळला." आवाज खूप छान लागला होता. गाणं अप्रतिम झाले असे तिघांचे पण मत होते. सलीलच्या मते एक सूर नीट लागला नाही पण नंतर सगळे गाणं सुरात आले.




पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "काही बोलायचे आहे पण बोलणार नाही" कुसुमाग्रजांचे गीत, त्याला यशवंत देवांचे संगीत आणि अरुण दातेचा स्वर असलेला हे गाणं तसा पेलायला कठीण आहे. माझ्या मते सगळे "नाही" नीट आले नाहीत. त्याचे उच्चार चांगले वाटले नाहीत. भाव नीट आले नाही असे सगळ्या परीक्षकांचे मत होते.





सहावे गाणं सागर जाधवने म्हटले. "दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो, कशी नशिबाने थट्टा आज मांडली". त्याने खूपच मस्त म्हटले. याच्या आवाजाला हे गाणं खूपच साजेशे होते. आणि त्याने अगदी संपूर्ण न्याय दिला गाण्याला असा मला वाटले. सलीलच्या मते अगदी भावपूर्ण झाले. अवधूतने नेहमीप्रमाणे तोडलंस, फोडलास असे मत दिले.



Today is the second day of the "knock out round". Today everyone will sing two song and judges will give marks only on that song. Result will be there at the end. Yesterday 3 participant went in the next round. Today's judge was Suresh Wadkar. Program starts by his song "Koti koti rupe tuzi, koti surya chandra tare".

Knock round starts by Mona Kamat's "Prabhati sur nabhi rangati". Next song was by Prasanna Prabhu Tendulkar "Sant bhar pandharicha". Third song was sung by Swapnil Chafekar, "Mazya mana lago chand, nitya govind". Forth song was by Mrumnayi Tirodkar "Waat pahuni jeev shinala". Then came Shrirang Joshi and performed "Kahi bolayache aahe pan bolnar nahi". Sixth song was by Sagar Jadhav, "Kashi nashibane thatta aaj mandali".

Now one more song will be performed by each participant and then result will be announced.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १३ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

दुसरं गाणं सादर करायला प्रथम आला प्रसन्ना प्रभू तेंडूलकर. त्याने "दिसलीस तू फुलले ऋतू". खूपच मनापासून गाणं म्हटले असे वाटत होते. सलीलला खूप आवडले आणि विशेष म्हणजे आवाजाची नक्कल न करता गायलीस याबद्दल कौतुक करण्यात आले. सुरेश वाडकरांच्या मते काही जागा अस्पष्ट येतात. अवधूतच्या मते पण गाणं खूप छान झाले.




त्यानंतरचे गाणं गायला आला स्वप्नील चाफेकर. त्याने "प्रीतीच्या चांदराती घेउनी हात हाती जोडू अमोल नाती ये ना " हे गाणं म्हटले. गाणं एकदम उडत्या चालीचे आहे. गाणं चांगले झाले असे सगळ्यांचे मत होते. मल्लिका शेरावत नऊवारी घातल्यावर ती जितकी लाजणार नाही तितका हा लाजत होता असा शेरा अवधूतचा होता. सलीलच्या मते गाणं चांगले म्हटले आणि सुरेश वाडकरांचे पण तेच मत होते.




तिसरा गाणं म्हणायला आली मृण्मयी तिरोडकर. हिने "लवलव करी पातं डोळा नाही थार्याला" माझ्या मते सुरवात इतकी छान झाली नाही. नंतर मात्र चांगले म्हटले. सलीलचे उदाहरण खूप मस्त असतात. तो म्हणाला कि तू तुझ्या मानानी नाचलीस वगैरे. सुरेश वाडकरांनी तिला काही बदल सुचवले. अवधूतने काही विशेष मत दिले नाही.




चौथं गाणं मोना कामातचे "मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतीने धुंद झाले". तिला वरचे स्वर गायला त्रास होत होता असे वाटत होते. कदाचित थोडे खाली घेतले असते तर ठीक झाले असते. गाणं चांगलं झाले असे अवधूत म्हणाला. सुरेश वाडकर म्हणाले कि तुला अजून मेहनत करायला हवी कारण गाण्याचा आत्मा हरवला आहे आहे वाटत होते. सलील म्हणाला कि मागच्या पेक्षा चांगले झाले पण सगळे मिळून चांगलं व्हायला हवा तसे झाले नाही.





पाचवे गाणं म्हणायला आला श्रीरंग जोशी. "हा छंद जीवाला लावी पिसे " सुरवात या गाण्याची अशी आहे कि त्यात सगळे तुम्ही किती तयार आहात गाण्यात हे दिसून येते. गाणं म्हणावे तितके छान झाले नाही. स्वर खूप ठिकाणी जात होते. सलीलच्या मते या गाण्यात श्रीरंग चा उत्साह जरा जास्त झाला आणि त्यामुळे सूर गेले. सुरेश वाडकरांचे मत पण काहीसे तसेच होते. अवधूतचे मत तसे होते पण तो म्हणाला कि वयाच्या मानानी चांगले गायलास.





सहावे गाणं म्हणायला आला सागर जाधव. "लिंगोबाचा डोंगुर आबाळी गेला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला". सागरच्या आवाजात अशी गाणी खूप छान होतात. अवधूत म्हणाला कि खूप छान गाणं म्हणून स्पर्धा संपवली आहे. सुरेश वाडकर म्हणाले कि छान म्हटले आणि सलीलचे पण मत तसेच होते.




आता निकाल. प्रसन्ना श्रीरंग आणि मृण्मयी सलीलच्या गटात होते. मृण्मयी आणि प्रसन्ना सलीलच्या गटातून पुढे गेली. अवधूतच्या गटात स्वप्नील, मोना आणि सागर. त्याच्या गटातून सागर पुढे गेला.





कार्यक्रमाची सांगता सुरेश वाडकरांच्या "गुरु एक जगी त्राता". या गाण्याने झाली.





First song in the second round of this part was by Prasanna Prabhu Tendulkar. He sung "Disalis tu phulale rutu". Second song was by Swapnil chafekar. He sung "Pritichya chandarati gheuni hat hati gheuni hat hati jodu amol nati ye na". Then came Mrunmayi Tirodkar. She sung "Lavlav kari paata dole nahi tharyala". Forth song was by Mona Kamat, "mi varyachya vegane aale, tuzya pritine dhund zale" Fifth song was by Shrirang Joshi, "ha chhand jeevala lavi pise". Sixth song was by Sagar Jadhav. "Lingobacha dongur abali gela". Now the result, Mrunmayi Tirodkar, Prasanna prabhu Tendulkar and Sagar Jadhav went in the next round. End of the program was by Suresh wadkar's song "Guru ek jagi trata".

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 1

पुढील फेरीमध्ये २४ स्पर्धक आले आहेत. त्यातील १२ स्पर्धक मागील आठवड्यात गायले आणि आज पुढील १२ गाणार आहेत. आजचे मान्यवर परीक्षक आहेत "सावनी शेंडे". हि शास्त्रीय संगीतात खूपच प्रसिध्ध आहे. आज एकूण ६ स्पर्धक आहेत प्रत्येक स्पर्धक २ गाणी सदर करणार आहेत.

आजच्या स्पर्धेची सुरवात सागर जाधवच्या "गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" या गाण्याने झाली. गाणं त्याच्या आवाजात खूप छान वाटत होते. सगळ्या परीक्षकांनी त्याची वाहवा केली पण मार्क "प" मिळाले.





दुसरं गाणं अश्विनी देशपांडेचे होते. तिने "अगा करुणाकरा" हे गाणं म्हटले. गाणं चांगले म्हटले. अवधूतच्या मुंगीच्या शेपटीवरील ढेकुण म्हणजे अतीच झाले. गाणं अप्रतिम होतं असा सलीलचा शेरा होतं. "ध" मिळाला.





तिसरं गाणं सुस्मिरता दवाळकरचे झाले. "बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव". जीव आणि भाव ओतून म्हटले. खूप छान म्हटले. अवधूत प्रथमच अध्यात्मावर बोलला. मला नीटसे कळलं नाही. पण त्यावर सलीलचे मत पटणारे होते. "ध" मिळाला. एका ठिकाणी उच्चार चुकले होते.





चौथे गाणं होते मृण्मयी तिरोडकरचे. हि अपक्ष उमेदवार होती मागील भागात. हिने "डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली" हे गाणं म्हटले. सावनीच्या मते पहिली ओळ खूप सुरात येते आणि तीच ओळ परत म्हटली कि कुठेतरी बेसूर होते. आणि अवधूतच्या मते ती घाबरली होती. पण तरीही तिला "ध" मिळाला.





पाचवे गाणं स्वरदा गोखले चे "नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला". सुरवातीला स्वर हलले असे सलीलचे मत होते. सगळ्या परीक्षकांनी कौतुक केले. "ध" मिळाला.





सहावे गाणे "चांदण्या रात्रीतली ती स्वप्ना तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा" हे मोना कामतने म्हटले. माझ्या मते खालचे स्वर जरा कापत होते. पण गाणं चांगले होते. सलीलला खूप आवडले नाही. कारण त्याच्या मते भाव नीट आले नाही. "प" मिळाला.



Today was the second week of the second round. Last week 12 participant had performed and this week next 12 will perform. Today, out of this 12, 6 will present 2 songs each. Today's special judge was Savani Shende. She is one of the blooming Hindustani classical singer in today's era. The episode started with the song "Gaon jagavit aali vasudevachi swari". Song was performed by Sagar Jadhav. Sagar got "pa". The second was by Ashwini Deshpande, Aga Karuna Kara. She got "dha" for this performance. Third song was by Susmirata Davalkar, "Bolava Viththal, pahava viththal", She got "dha" for this. Forth song was by Mrunmayi Tirodkar, "Dolyavarun mazya utarun ratra geli". Performed very well and received "dha". Fifth song was by Swarada Gokhale, "Thakale re nandalala". Very well sung, received "dha". The last song was by Mona Kamat, "Chandanya ratritali ti swapna tu visarun ja". As per the judges she was little tensed and that is why performance was not upto the mark. She received "pa". So in the first round of today, Sagar Jadhav and Mona Kamat was trailing. Now let us see what happens in the next performance.

Part 2

पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ५ ऑक्टोबर २००९. (SRGMP MARATHI SEASON 7) PART 2

Part 1

आता आजच्या भागातील गाणं म्हणण्याची दुसरी संधी. पुन्हा सागर जाधव गाणं गायला येतो. "या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे". मंगेश पाडगावकरांचे अजरामर गाणं. सागरने खूपच छान म्हटले. "ध" मिळाला.





नंतरचे गाणं मृण्मयी तिरोडकर "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं, बाई जडली आता दोन जीवांची प्रीती गं" सलीलच्या मते गाणं घाबरल्यासारखे झाले. सावनीचे मत तसेच होते, कि सुराला कमी जास्त होतं. अवधूतच्या मते हिच्या आवाजाला हे गाणं योग्य होतं. तिला "प" मिळाला.






नववे गाणं, "शंभो शंकरा, करुणाकरा " स्वरदा गोखलेच्या आवाजात. अवधूतच्या मते हिचा आवाज खूप गोड आहे. अवधूतच्या उपमा काहीही असतात असे आता जाणवले. सावनीच्या मते सुरवातीला जास्त छान झाले नंतर, कुठेतरी गाणं निसटले. सलीलला पण तसेच वाटले. तिला "प" मिळाला.





दहावे गाणं सुस्मारिता दवाळकारच्या आवाजात "नको रे नंदलाला ". सगळ्या परीक्षकांच्या मते हिने खूप छान म्हटले आणि गाण्यातले फरक चांगले दाखवून दिले. एक नोट वर चालले असते असा सगळ्यांचा सूर होता. "ध" मिळाला.





११ वे गाणं मोना कामातचे "अंगणी माझ्या मनाच्या मोर दाटू लागले". सलीलच्या मते जागा घेताना कष्ट पडत होते. पण एकूण गाणं चांगल झाले. पुन्हा "प" मिळाला.





शेवटचे गाणे "गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी" हे अश्विनी देशपांडेचे झाले. मला धृवपद जरा नाकातून वाटले. सलीलच्या मते श्वास पूरत नव्हता. सावनी म्हणाली कि हे गाणं कठीणच आहे पण तरीही तिला ते आवडले. खालचे स्वर नीट लागले नाहीत असा अवधूतचा शेरा होता. "प" मिळाला.





आता निकाल. दोन्ही गाणी ज्यांची चांगली झाली तेच पुढे जाणार असं ठरले होते त्यानुसार सुस्मिरता दवाळकर आणि स्वरदा गोखले पुढे गेल्या. आणि आजचा "बेस्ट पेर्फोर्मेर" म्हणून स्वरदा गोखलेला निवडले गेले. सावनीच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.






Now the second song performance by all the participants. Sagar Jadhav sung "ya janmavar ya jaganyavar". Next song was by Mrunmayi Tirodkar "balagu kashala vyartha kunachi bhiti ga". After that Swarada Gokhale performed "Shambho shankara". Susmita Davalkar's "nako re nandalala" was the next song. and then Ashwini Deshpande sung "tu tar chaphekali". And then in the result, only 2 people went ahead, Swarada Gokhale and Susmirata Davalkar. Swarada Gokhale received the best performer award.